शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

काळ््या पैशावाल्यांसाठी काँग्रेस लढतोय : भाजपा

By admin | Published: April 04, 2017 5:13 AM

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली

नितीन अग्रवाल,नवी दिल्ली- काळा पैसा बाळगणाऱ्यांच्या बाजुने काँग्रेस लढत असल्याचा आरोप भाजपाने केला व भ्रष्टाचाराचे आरोप असलेले हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका करण्यात आली.भाजपचे सरचिटणीस भूपेंद्र यादव रविवारी पक्षाच्या येथील मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘‘काँग्रेस काळ््यापैशाच्या विरोधात नाही तर काळा पैसा बाळगणाऱ्यांसाठी लढत आहे. वीरभद्र सिंह संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये केंद्रात मंत्री असताना त्यांनी सफरचंदांच्या उत्पादनातून सहा कोटी रुपयांचा नफा झाल्याचे आयकर विवरणपत्रात नमूद केले होते. त्याआधी व त्यानंतर त्यांना सफरचंदांच्या बागांतून मिळणारे उत्पन्न शून्य होते.’’ ज्या वाहनांतून सफरचंदे बाजारात पोहचवण्यात आली ती वाहने स्कूटर व मोटारसायकली होत्या, असाही आरोप यादव यांनी केला.भूपेंद्र यादव यांनी वीरभद्र सिंह यांच्या भ्रष्टाचाराच्या निमित्ताने राहुल गांधी यांनाही लक्ष्य केले. राहुल गांधी स्वत:ला शेतकऱ्यांचे हितरक्षणकर्ते समजतात मग त्यांनी वीरभद्र सिंह यांनी कमावलेल्या नफ्याचे गणित देशाला समजावून सांगितले पाहिजे. देशातील कष्टकरी शेतकऱ्यांचा हा अपमान आहे. गांधी हे काहीच बोलत नसल्यामुळे त्यांच्या हेतुबद्दल शंका येत आहे. वीरभद्र सिंह यांचा राजीनामा काँग्रेसने घेतला नाही तर याचा अर्थ असा होईल की भ्रष्टाचाराशी तडजोड करणारा हा पक्ष आहे, असे यादव म्हणाले. गेल्याच आठवड्यात वीरभद्र सिंह यांची माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द करा ही मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. वीरभद्र सिंह यांनी त्यांच्यावरील केंद्रीय गुप्तचर खात्याने केलेले आरोप हे राजकीय हेतुंनी प्रेरीत असल्याचेही म्हटले आहे.>सपचा प्रवक्ता भाजपातसमाजवादी पक्षाचे प्रवक्तेपद भूषवलेले गौरव भाटिया रविवारी भाजपात दाखल झाले. त्यांनी पक्ष मुख्यालयात पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना भाटिया उत्तर प्रदेशचे अवर महाअधिवक्ता होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाटिया यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.भाजपामध्ये दाखल झाल्यावर भाटिया यांनी समाजवादी पक्षातील घराणेशाहीमुळे दु:खी होऊन पक्षाशी नाते तोडल्याचे सांगितले. आत्म्याने हाक दिल्यामुळे मी भाजपात आल्याचा दावा गौरव भाटिया यांनी केला.