शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पंजाबमधील गटबाजी सोडविण्यास सोनियांचा हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 09:31 IST

तीन सदस्यीय उच्चाधिकार समिती स्थापन, चर्चेतून मार्ग काढण्यावर भर

नवी दिल्ली : पंजाबमध्येकाँग्रेसला पक्षांतर्गत गटबाजीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींनी हस्तक्षेप केला असून तीन सदस्यीय उच्चाधिकार समिती गठित केली आहे. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना या समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. खरगे यांच्यासह पंजाबचे प्रभारी हररीश रावत आणि दिल्ली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जे. पी. अग्रवाल यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. खरगे यांनी शनिवारी समितीची एक बैठकही घेतली. पंजाबमधील समस्या चर्चेतून सोडविण्यात येईल आणि त्यासाठी एकता हाच मंत्र असल्याचे समितीतील एका सदस्याने लोकमतला सांगितले. पुढील काही दिवसांमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि बंडखोरी करणारे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह आमदार आणि खासदारांना दिल्लीत बोलाविण्यात येणार आहे. समितीकडून त्यांची सर्व गाऱ्हाणी ऐकून घेण्यात येतील. गटबाजी शमविण्यासाठी पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद द्यावे किंवा सिद्धू यांना मंत्रिपद देऊन राज्यात क्रमांक दोनचे स्थान देण्याच्या प्रस्तावाबाबत विचारले असता तशी माहिती नसल्याचे जे. पी. अग्रवाल यांनी सांगितले. पंजाबमधील बंडखोरी शमविणे आवश्यकछत्तीसगडनंतर काँग्रेसचे दुसरे स्थिर राज्य आहे. मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे सत्तांतर झाले होते. तसेच राजस्थानातही अस्थ‍िरता निर्माण झाली आहे. मात्र, पंजाबमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे वादळ शमविणे आवश्यक आहे. ही जाणीव असल्यानेच स्वत: सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप केला आहे. अमरिंदरसिंग यांच्याविरोधात अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये मोठा गट सक्रिय झाला असून एकतेने लढल्याशिवाय निवडणुकीत यश मिळणार नाही, अशी भीती राज्यातील काँग्रेस नेत्यांना आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसPunjabपंजाब