शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

“बाहेरचा रस्ता दाखवत नाही, तोपर्यंत आम्ही पक्षातच राहणार”; G-21 नेत्यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 8:01 AM

भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस सक्षम असून, त्याच्या पर्यायांवर पक्षाने विचार करणे आवश्यक आहे, असे या गटातील नेत्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: देशभरातील पाच राज्यांच्या निवडणुकीत सपाटून पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या काँग्रेसच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुकीतील पराभवाचे दीर्घ चिंतन करण्यात आले. यानंतर काँग्रेसमधील असंतुष्ट गट असलेल्या जी-२१ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक नवी दिल्लीत पार पडली. यावेळी आम्हाला जोपर्यंत बाहेरचा रस्ता दाखवला जात नाही, तोपर्यंत पक्षातच राहणार आणि काँग्रेसचे कार्य करणार, अशी स्पष्ट भूमिका G-21 गटातील नेत्यांनी घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपविरोधात काँग्रेसला मजबुतीने उभे करणे काळाची गरज बनलेले आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस सक्षम आहे. मात्र, त्याबाबतच्या पर्यायांवर पक्षाने विचार करणे आवश्यक आहे. पक्षामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. जी-२१ गटाची आगामी भूमिका लवकरच स्पष्ट करण्यात येईल, असे या बैठकीनंतर काढलेल्या संयुक्त पत्रकात म्हटल्याचे सांगितले जात आहे. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या असंतुष्ट असलेल्या जी-२१ गटाच्या नेत्यांची बैठक झाली. यामध्ये अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. 

कपिल सिब्बलांचे आरोप अन् काँग्रेसचे प्रत्युत्तर

पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर काँग्रेसमध्येच दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. या दोन गटांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. आता गांधी घराण्याने काँग्रेस नेतृत्वाचा भार सोडावा आणि कुण्या दुसऱ्या नेत्याला जबाबदारी द्यावी. काही लोक काँग्रेसच्या आतील आहेत, तर काही काँग्रेसच्या बाहेरील आहेत. पण खऱ्या आणि सर्वांच्या काँग्रेससाठी, काँग्रेस बाहेरील लोकांचेही ऐकायला हवे. ज्या पद्धतीने काँग्रेसची अधोगती होत आहे, ती मला पाहावली जात नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांच्या काँग्रेससाठी संघर्ष करत राहणार, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले होते. यावर, ते एक चांगले वकील असू शकतात. परंतु चांगले नेते नाहीत. ते कधीही कोणत्याही गावात काँग्रेसचे काम करण्यासाठी गेले नाहीत. ते जाणूनबुजून पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाला कोणीही कमकुवत करू शकत नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा पलटवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. 

दरम्यान, गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, अखिलेश प्रताप सिंह, शंकर सिंह बघेला, शशी थरूर, संदीप दीक्षित, एम.ए.खान, विवेक तन्खा, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, भूपेंद्र सिंह हुड्डा, राज बब्बर, मणिशंकर अय्यर, पी.जे.कुरियन, राजिंदर कौल भट्टर, कुलदीप शर्मा आणि प्रेणित कौर या जी-२१ गटाच्या नेत्यांनी परिपत्रक काढले आहे. निवडणूक निकालांनंतर काँग्रेसच्या जी-२१ गटाच्या नेत्यांची ही दुसरी बैठक होती. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण