शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

काँग्रेसनेच भारतात घराणेशाही आणली

By admin | Published: June 27, 2016 4:13 AM

देशात आणीबाणी लागू करण्याला ४१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी काँग्रेसवर निशाणा साधला.

नवी दिल्ली : देशात आणीबाणी लागू करण्याला ४१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी काँग्रेसवर निशाणा साधला. तब्बल दोन दशके रखडलेल्या आर्थिक सुधारणा, भारताची लोकशाही ‘घराणेशाही’त परिवर्तीत आणि भ्रष्टाचारास सर्वस्वी काँग्रेसच जबाबदार आहे, असा स्पष्ट आरोप जेटली यांनी केला.काँग्रेसच्या खात्यात आणीबाणीशिवाय सुवर्ण मंदिरातील आॅपरेशन ब्लू स्टार राबविल्याचाही कलंक लागलेला आहे. या मुद्यांवर सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाचे काही मत आहे काय? स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेस पक्षावर दृष्टिक्षेप टाकला तर या पक्षावर आर्थिक सुधारणांमध्ये दोन दशकांचा विलंब लावणे, भारताच्या लोकशाहीचे घराणेशाहीत रूपांतर करणे, १९७५ मध्ये आणीबाणी लागू करणे, आॅपरेशन ब्लू स्टार आणि भ्रष्टाचार यांसारखे अनेक कलंक लागले आहेत, असे जेटली म्हणाले.४१ वर्षांपर्वी २६ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यानिमित्त ‘४१ वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी लागू केलेली संवैधानिक हुकूमशाही’ या शीर्षकाखाली जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर हे भाष्य केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) >हुकूमशाही आणली‘आणीबाणीचा परिणाम देशात हुकूमशाही लागू करण्यात झाला. सर्व राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आले. याविरुद्धच्या याचिकांवर सुनावणी करण्याचे न्यायालयांचे अधिकार काढून घेण्यात आले. हुकूमशाहीपुढे न्यायालय नतमस्तक झाले. प्रेस सेंसॉरशीप लागू करण्यात आली. मीडियाही हुकूमशहांचा प्रवक्ता बनला. सार्वजनिक स्थळी निदर्शने करण्यास बंदी घालण्यात आली. त्यावेळी संसदेत विरोधी पक्षही नव्हता. हुकूमशहाने आपला पुत्र संजयला आपला उत्तराधिकारी म्हणून पुढे करून भारताला घराणेशाही व्यवस्थेत रूपांतरित केले. पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीचा गळा आवळण्यात आला,’ असेही जेटली यांनी म्हटले आहे.