शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ईशान्येकडील दुर्लक्ष काँग्रेसला भोवले; नागालँड, त्रिपुरामध्ये खातेही उघडता आले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 03:46 IST

मेघालयात बहुमताच्या जवळ पोहोचलेल्या काँग्रेसची त्रिपुरा व नागालँडमध्ये अवस्था फारच वाईट झाली आहे. त्रिपुरात काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही, तर नागालँडमध्येही हा पक्ष रिंगणातच नव्हता. तिथेही या पक्षाला कुठेच विजय मिळवता आला नाही.

नवी दिल्ली : मेघालयात बहुमताच्या जवळ पोहोचलेल्या काँग्रेसची त्रिपुरा व नागालँडमध्ये अवस्था फारच वाईट झाली आहे. त्रिपुरात काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही, तर नागालँडमध्येही हा पक्ष रिंगणातच नव्हता. तिथेही या पक्षाला कुठेच विजय मिळवता आला नाही.नसलेली संघटना, उमेदवारांची वानवा, निवडणुकांसाठी पैसा नाही व केंद्रीय नेतृत्वाचे नसलेले लक्ष याचेच परिणाम काँग्रेसला भोगावे लागले. त्रिपुरामध्ये राहुल गांधी यांनी एकच सभा घेतली. नागालँडमध्ये काँग्रेसला आपले पाच उमेदवार मागे घ्यावे लागले. तिथे पक्षाचे १८ उमेदवारच होते. इथे काँग्रेसने २0१३ साली ४८ उमेदवार उभे करून, १0 जागी विजय मिळवला. काँग्रेसला यंदा जेमतेम दोन टक्केच मते मिळाली.काँग्रेसचे प्रभारी सी. पी. जोशी यांना तेथील राज्यांचे नेते दोष देत आहेत. जोशी तिथे येत नसत. त्यांनी राहुल गांधी यांनाही येऊ दिले नाही, असा आरोप नागालँड काँग्रेसचे अध्यक्ष केवे थापे थेरी यांनी केला. जोशी यांनी नागालँडमध्येच नव्हे, तर ईशान्येतून काँग्रेस संपवली, अशी टीका त्यांनी केली. नागालँडमध्ये २0१३ साली काँग्रेसने ५६ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ८ जागा जिंकल्या होत्या. तेव्हा २४.८९ टक्के मते मिळवणाºया काँग्रेसला यंदा भोपळाही फोडता आला नाही.आम्ही संपलेलोनाही : काँग्रेसत्रिपुरातील काँग्रेसच्या नेत्यांचेही नेमके हेच म्हणणे आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष बिराजीत सिन्हा यांनी मात्र आमचे केंद्रात सत्तेत नसल्याने आमची आतापर्यंतची पारंपरिक मते भाजपाकडे गेली, असे विश्लेषण केले. आमचा राज्यात प्रथमच असा पराभव झाला नसून, १९७७ सालीही आम्ही पराभूत झालो होतो, पण आम्ही पुन्हा १९८८ साली सत्तेत आलो होतो. यावेळी मेघालयात काँग्रेस सरकार स्थापन करेल, असा दावा पक्षाच्या प्रभारी यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

टॅग्स :Tripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018BJPभाजपा