शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 19:25 IST

Lok Sabha Election 2024: काँग्रेस चीनबाबत बोलताना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकांसाठी नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवते. तसेच यामध्ये नेहरूंचा काही दोष नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न करते.

मागच्या काही वर्षांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून सुरू असलेल्या कारवायांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सातत्याने लक्ष्य करत असतात. त्यावरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. नेहरूंनी केलेल्या चुकांसाठी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जबाबदार धरतेय, अशी टीका जयशंकर यांनी केली आहे. 

जयशंकर चीनबाबतच्या धोरणाबाबत म्हणाले की, चीनबाबत नरेंद्र मोदी यांची भूमिका ही स्पष्ट राहिलेली आहे. सत्तेत आल्यापासून भाजपा सरकारने एलएसीजवळच्या भागात वेगाने बांधकाम सुरू केलं आहे. आतापर्यंत अनेक रस्ते आणि बोगद्यांचं काम झालं आहे. असं असतानाही काँग्रेकडून चीन भारताच्या जमिनीवर कब्जा करतेय, असा आरोप केला जातोय. काँग्रेस चीनबाबत बोलताना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकांसाठी नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवते. तसेच यामध्ये नेहरूंचा काही दोष नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न करते. लडाख आणि अरुणाचल प्रदेशमधील चीनच्या आक्रमणाबाबत जयशंकर म्हणाले की, चीनने १९५८ आणि १९६२ मध्ये भारताच्या जमिनीवर कब्जा केला होता. 

यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही जयशंकर यांनी टीका केली. आपल्याच सुरक्षा दलांवर टीका करणे दु:खद बाब आहे. जेव्हा तुम्ही चीनने जमीन घेतली म्हणता तेव्हा ती १९६२ मध्येच गेली, हे समजून घेतलं पाहिजे. सध्या देशाची दिशाभूल केली जात आहे. सध्या भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. तसेच २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये अधिकच तणाव निर्माण झालेला आहे. तसेच दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अधिकाधिक सैनिक तैनात केलेल आहे, असे जयशंकर म्हणाले.

चीनकडून सीमारेषेवर गाव वसवले जात असल्याच्या प्रश्नालाही जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे. काही लोक म्हणतात की, चिनी लोक सीमेवर गाव वसवत आहेत. मात्र हे बांधकाम लोंगजू येथे होत आहे. त्यावर चीनने १९५९ मध्ये हल्ला करून कब्जा केला होता. मात्र तुम्ही गुगल मॅपवर ते गावा पाहा आणि त्याबाबत १९५९  मध्ये जवाहरलाल नेहरूंनी केलेलं भाषण समजून घ्या. राहुल गांधी लडाखमधील पँगाँग सरोवरात चीनने पूल बांधल्याचे सांगत आहेत. मात्र ते पूल त्या जागी बांधण्यात आलं आहे जिथे १९५८ मध्ये चिनी आले होते. तसेच त्यांनी १९६२ मध्ये त्यावर कब्जा केला होता. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीS. Jaishankarएस. जयशंकरJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूcongressकाँग्रेस