शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

Congress: होय, ‘ती’ माझी चूक झाली…; काँग्रेस कार्यकारणी बैठकीत सोनिया गांधींची स्पष्ट कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 3:46 PM

५ राज्यातील काँग्रेस निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी गांधी कुटुंबाची आहे असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली – देशात नुकतेच ५ राज्यांचे निकाल लागले आहेत. या निकालात सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ज्या पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती तिथे अरविंद केजरीवालांच्या ‘आप’नं काँग्रेसचा दारूण पराभव केला आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधील नाराज नेत्यांनी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्यास सुरूवात केली आहे. यातच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी(Congress Sonia Gandhi) यांचं मोठं विधान समोर आलं आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा बचाव करणं ही माझी चुकी होती. मी कॅप्टन यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या कार्यकारणी बैठकीत रविवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पदावरून हटवायचं होतं तर आधीच हटवलं पाहिजे होतं असा विषय चर्चेला आला. तेव्हा सोनिया गांधींनी हे विधान केले. निवडणुकीपूर्वीच अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली. भाजपासोबत आघाडी करून त्यांनी पंजाब निवडणुकीत उमेदवार उभे केले. परंतु त्यांच्या पक्षाला काही करिष्मा करता आला नाही.

अमरिंदर सिंग यांचा गांधी कुटुंबावर निशाणा

दुसरीकडे अमरिंदर सिंग यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ५ राज्यातील काँग्रेस निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी गांधी कुटुंबाची आहे. भ्रष्ट चन्नी आणि विचलित सिद्धुच्या पाठिंब्यावर काँग्रेसनं स्वत:ची कबर खोदली. पंजाबच नव्हे तर यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर याठिकाणीही गांधी कुटुंबामुळेच पराभव झाला. याचं कारण म्हणजे गांधी घराण्यावरील लोकांचा विश्वास आता उठत चालला आहे.

आम्ही त्याग करण्यास तयार

रविवारी काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, काही लोकांच्या मते, गांधी कुटुंबामुळे पक्ष कमकुवत होत आहे. जर पक्षातील नेत्यांनाही असं वाटेल असेल तर आम्ही कुठल्याही प्रकारच्या त्यागाला सामोरे जाण्यास तयार आहोत. आमचं पहिलं लक्ष्य काँग्रेस मजबूत करण्याकडे आहे. त्यासाठी कुठल्याही त्याग देण्यास आम्ही तयार आहोत असं त्यांनी सांगितले. आता एप्रिल महिन्यात काँग्रेसचं चिंतन शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. तोवर सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षा राहतील. परंतु काँग्रेस पक्षातील नेत्यांनी सोनिया गांधी यांना पाठिंबा देत पराभवाला राज्यातील नेते आणि खासदार, आमदार जबाबदार आहेत. केवळ एकट्या सोनिया गांधी नाही असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.      

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस