शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

“नवीन संसद ही ‘मोदी कॉम्प्लेक्स’, २०२४ मध्ये सत्ताबदलानंतर योग्य उपयोग होईल”: जयराम रमेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 5:54 PM

Jairam Ramesh News: नवीन संसद भवनातील त्रुटी दाखवत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

Jairam Ramesh News: गेल्या आठवड्यात संसदेचे विशेष अधिवेशन झाले. या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आले. तसेच आणखी एका विशेष कारणाने हे अधिवेशन महत्त्वाचे ठरले. ते म्हणजे नवीन संसद. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज नवीन संसद भवनातून सुरू झाले. मात्र, यावरून विरोधकांकडून सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली जात आहे. नवीन संसदेला ‘मोदी कॉम्प्लेक्स’ म्हटले पाहिजे. २०२४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर नवीन संसदेचा योग्य प्रकारे उपयोग होईल, या शब्दांत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निशाणा साधला. 

एवढ्या गाजावाजा करून नवीन संसद भवनात कामकाज सुरू झाले. मात्र, यामुळे प्रत्यक्षात पंतप्रधानांच्या उद्दिष्टांची जाणीव होते. याला मोदी मल्टिप्लेक्स किंवा मोदी मॅरियट म्हणावे. जुन्या संसद भवनापेक्षा नव्या संसदेत खासदारांना संवाद साधण्यासाठी जागा राहिली नाही. तसेच, कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या सुविधाही मिळत नाहीत, असा दावा जयराम रमेश यांनी केला आहे. एक्सवर एक ट्विट करत जयराम रमेश यांनी नव्या संसद भवनातील त्रूटी दर्शवत केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.

२०२४ मध्ये सत्तातरानंतर नवीन संसद भवनाचा चांगला वापर होईल

संसदेतील निखळ आनंद नाहीसा झाला आहे. जुन्या इमारतीत जाण्यासाठी उत्सुक असायचो. नवीन कॉम्प्लेक्स आरामदायी किंवा सुटसुटीत नाही. मला खात्री आहे की, माझ्या पक्षातील अनेक सहकाऱ्यांना असेच वाटत असेल. सचिवालयातील कर्मचार्‍यांकडून असेही ऐकले आहे की, नवीन इमारतीच्या डिझाईनमध्ये त्यांना त्यांचे काम करण्यास मदत करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध गोष्टींचा विचार केला गेला नाही. लोकांशी सल्ला-मसलत न करता गोष्टी केल्या की, असे होते. २०२४ मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर कदाचित नवीन संसद भवनाचा अधिक चांगला उपयोग होईल, असा दावा जयराम रमेश यांनी केला. तसेच खासदारांना एकमेकांना पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज लागते, असा टोलाही लगावला.

दरम्यान, जयराम रमेश यांनी केलेल्या टीकेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसची मानसिकता वाईट आहे. १४० कोटी भारतीयांचा हा अपमान आहे. संसदेला विरोध करण्याची काँग्रेसची ही पहिलीच वेळ नाही. १९७५ मध्येही काँग्रेसने असा प्रयत्न केला होता. पण, त्यांना अपयश आले, असा पलटवार नड्डी यांनी केला.  

टॅग्स :Parliamentसंसदcongressकाँग्रेस