शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

“भाजपाचे ऑपरेशन फेल, राज्यपाल PMO च्या इशाऱ्यावर काम करतायत”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 20:15 IST

Congress Vs BJP: भाजपाचे झारखंडमधील योजना आणि सगळे ऑपरेशन फेल गेले, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

Congress Vs BJP: हेमंत सोरेन यांच्यावरील ईडीची कारवाई, मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा आणि झारखंडमधील राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर अखेरीस झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने आपला गड कायम राखला आहे. हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. यानंतर चंपई सोरेन यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. चंपई सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर, भाजपाचे ऑपरेशन फेल गेले, असे सांगत काँग्रेसने भाजपावर सडकून टीका केली आहे.

झारखंडमधील सरकार पाडण्यासाठी भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत असल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जात होता. याबाबत जयराम रमेश म्हणाले की, भाजपाचे ऑपरेशन फेल गेले आहे. आता आमचे युतीचे सरकार उर्वरित एक वर्ष आरामात पूर्ण करेल. यानंतर आमच्या कामाची माहिती देऊन जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा निवडणूक लढवू. राज्यपाल पंतप्रधान कार्यालयाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला.

सोरेन सरकार बहुमत मिळवेल, याचा विश्वास होता

चंपई सोरेन सरकार बहुमत मिळवेल, यावर आमचा विश्वास होता. आम्हाला ४७ आमदारांचा पाठिंबा होता, जो बहुमतापेक्षा जास्त आहे. मात्र, भाजपा ऑपरेशन अयशस्वी झाले. भाजपाने आधी हेमंत सोरेन यांना अटक केली आणि नंतर चंपई सोरेन यांच्या शपथविधीला उशीर केला. मात्र, भाजपाची संपूर्ण योजना फसली, अशी टीका जयराम रमेश यांनी केली. 

दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा झारखंडमध्ये आहे. जयराम रमेश यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यावर टीका केली. अनेक राज्यांमध्ये राज्यपाल पक्षपातीपणा करत आहेत. तामिळनाडू, केरळ, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर, झारखंड आणि बिहारमधील राज्यपाल पंतप्रधान मोदींचे कार्यालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार काम करतात, असा आरोप जयराम रमेश यांनी केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसJharkhandझारखंड