शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसने खेळला अखेरचा डाव; बंडखोरांनी उलटवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 08:44 IST

बंगळुरू : कर्नाटकातील आघाडीचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस -जेडीएसने शेवटचा डाव खेळला असून यालाही बंडखोर आमदारांनी टोलवले आहे. तसेच आम्हाला ...

बंगळुरू : कर्नाटकातील आघाडीचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जेडीएसने शेवटचा डाव खेळला असून यालाही बंडखोर आमदारांनी टोलवले आहे. तसेच आम्हाला कोणीही बंदुकीच्या धाकावर मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले नसून आम्ही आमच्या मर्जीनेच येथे राहत असल्याचे या आमदारांनी स्पष्ट केले आहे. 

बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी अपयशी ठरलेल्या काँग्रेस-जेडीएस सरकारने शेवटचा पत्ता खोलला आहे. यामध्ये मुख्यमंत्रीच बदलण्याचा प्रस्ताव दिला आहे. या बंडखोरांनी राजीनामा देताना कुमारस्वामींनाच जबाबदार ठरविले होते. यामुळे या आमदारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव दिला आहे. या आमदारांच्या म्हणण्यानुसार सा. बांधकाम मंत्री आणि कुमारस्वामी यांचे भाऊ एचडी रेवन्ना यांच्या हस्तक्षेपामुळे राजीनामा देत आहोत. या आमदारांनी सध्याच्या संकटाला कुमारस्वामी आणि त्यांच्या भावाला दोषी धरले होते. 

कर्नाटकचे काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी हे वृत्त फेटाळले आहे. की जेडीएसने काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला आहे. जेडीएसने सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी प्रस्ताव दिल्याचे वृत्त होते. तर रविवारी डी के शिवकुमार यांनी सांगितले होते की, जेडीएसने सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्याची तयारी दाखवली आहे. तसेच जेडीएसने सिद्धरामय्या, जी परमेश्वर यांच्यासह कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्री बनविण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. 

या प्रस्तावावर काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी आता पुन्हा परतण्य़ाची शक्यता नसल्याचे सांगितले. सिद्धरामय्यांना जरी मुख्यमंत्री बनविले तरीही परत येण्याचा विचार नसल्याचे सांगत हा प्रस्ताव फेटाळला आहे. तसेच आता आमच्या आत्मसन्मानाला ठेच लागल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)BJPभाजपा