शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

७ वर्षात ७० वेळा पेपर फुटला, नीट व्यावसायिक परीक्षा बनवली - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 17:45 IST

राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की, तुम्ही प्रत्येक व्यक्तीला भीतीचे पॅकेज दिले आहे. आता नवीन फॅशन नीट झाली आहे.

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात राहुल गांधींनी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संविधान, महागाई आणि अग्निवीर योजनेवरून हल्लाबोल केल्यानंतर राहुल गांधी यांनी नीट पेपर लीकवरूनही निशाणा साधला. सरकार पेपरफुटी थांबवू शकले नाही आणि सात वर्षात ७० वेळा पेपर फुटले, असे म्हणत सरकारने नीटला व्यवसायिक परीक्षा बनवल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की, तुम्ही प्रत्येक व्यक्तीला भीतीचे पॅकेज दिले आहे. आता नवीन फॅशन नीट झाली आहे. तुम्ही प्रोफेशनल स्कीमचे कमर्शियल स्कीममध्ये रूपांतर केले आहे. नीट ही श्रीमंत मुलांसाठी करण्यात आली आहे. सरकारने प्रोफेशनल परीक्षा ही कमर्शियल परीक्षा केली आहे. विद्यार्थी ६ महिने नीट परीक्षेची तयारी करतात. नीटच्या विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेवर विश्वास राहिलेला नाही.

दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभेत या चर्चेत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर जोरदार गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं की, नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात एका दिवशी म्हटले की, हिंदुस्तानने कधी कुणावर आक्रमण केलं नाही. याचं कारण आहे हिंदुस्तान अहिंसेचा देश आहे. आपल्या महापुरुषांनी डरो मत, डराओ मत असे म्हटले. 

भगवान शंकर म्हणतात डरो मत, डराओ मत आणि त्रिशुल जमीन रोवतात. दुसरीकडे जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात, ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा, नफरत-नफरत-नफरत, तुम्ही हिंदू असूच शकत नाही. हिंदू धर्मानं स्पष्टपणे म्हटले आहे की, सत्याची साथ द्या, असे राहुल गांधी म्हणाले. यानंतर भाजप नेते आक्रमक झाले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेप घेतला. 

नीटवर सभागृहात एक दिवस चर्चा व्हायला हवी : राहुल गांधीनीट परीक्षेतील अनियमिततेवर सभागृहात चर्चेची मागणी करताना राहुल गांधी म्हणाले, "आम्हाला वाटते की, नीट मुद्द्यावर एक दिवसीय चर्चा व्हायला हवी. गेल्या सात वर्षांत ७० वेळा पेपर फुटले आहेत. संसदेतून देशाला संदेश दिला जातो. आम्ही विद्यार्थ्यांना असा संदेश देऊ इच्छितो की, नीटचा मुद्दा संसदेसाठी किती महत्त्वाचा आहे."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदlok sabhaलोकसभा