शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
2
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
4
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
5
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
6
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
7
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
8
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
9
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
10
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
11
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
12
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
13
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
14
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
15
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
17
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
18
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
19
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
20
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?

“राहुल गांधींना ज्येष्ठांशी कसं वागावं कळत नाही”; आणखी एका बड्या नेत्याचा काँग्रेसला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 1:42 PM

राहुल गांधींच्या धोरणांमुळे काँग्रेसची वाताहात झाली असून, त्यांची विचारसरणी पक्षाील ब्लॉक ते बूथ पातळीपर्यंत कुणाशीच जुळत नाही, अशी घणाघाती टीका करत बड्या नेत्याने राजीनामा दिला.

नवी दिल्ली: महाराष्ट्रात एकीकडे शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होत असताना दुसरीकडे काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या आरोपांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसला आहे. राहुल गांधींवर हल्लाबोल करत काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याने पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. 

राहुल गांधींच्या नेतृत्वावर टीका करत पक्षाच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, गुलाम नबी आझाद यांनी मांडलेल्या मुद्द्यांचाच पुनरुच्चार त्यांनी राजीनामा देताना केला आहे. राहुल गांधींची एक वेगळीच विचारसरणी असून ती पक्षाच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांनी जुळत नसल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. तेलंगणामधील काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडत राजीनामा दिला आहे. 

राहुल गांधींना ज्येष्ठांशी कसे वागावे ते कळत नाही

राहुल गांधींच्या धोरणांचा परिणाम म्हणून काँग्रेसची वाताहत झाली आहे. पक्ष अशा पातळीला येऊन पोहोचला आहे. जिथे गेली अनेक दशके पक्ष उभारणीचे काम केलेले ज्येष्ठ नेतेच पक्षाला सोडून जात आहेत. ज्येष्ठांशी कसे वागायचे, हे राहुल गांधींना माहिती नाही, अशी घणाघाती टीका खान यांनी केली. तसेच राहुल गांधींनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा कारभार सांभाळल्यापासून परिस्थिती अधिकच खराब होत गेली आहे. राहुल गांधींकडे त्यांची अशी एक वेगळीच विचारसरणी आहे. पण ती विचारसरणी पक्षातल्या ब्लॉक पातळीपासून बूथ पातळीपर्यंत कुणाशीच जुळत नाही, अशी टीकाही खान यांनी केली आहे. 

दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा केली. राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि खासकरुन जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर याआधी असलेली सल्लागार यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आली. तसेच पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारुन कोणताही अनुभव नसणारे पक्षाचे कामकाज चालवू लागले. राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला हे फारच बालिशपणाचे होते. २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवात याचा मोठा वाटा होता, असा दावा गुलाम नबी आझाद यांनी केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण