शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सरकारने अहंकार सोडून कृषी कायदे रद्द करावेत; राहुल गांधींचा पुनरुच्चार

By देवेश फडके | Updated: February 7, 2021 12:30 IST

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत, असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींची पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकाकृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चारशेतकऱ्यांचे चक्का जाम शांततेत

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत कृषी कायदे रद्द केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांचे हे आंदोलन ०२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. (Rahul Gandhi Criticized Central Government over Farmers Law)

राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. शेतकऱ्यांचा आता गांधी जयंतीपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा दृढ संकल्प आहे. मोदी सरकारवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही, हे यावरून स्पष्ट होते, असे सांगत मोदी सरकारने अहंकार सोडावा. आंदोलक शेतकऱ्यांच्या वेदना समजून घ्याव्यात आणि कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केंद्रीय कृषी कायद्यावरून टीका करत आहेत. काँग्रेसचा या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे यापूर्वीच राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते. शेतकऱ्यांचे शांततेने सुरू असलेले आंदोलन देशहिताचे आहे. केंद्रीय कृषी कायदे केवळ शेतकऱ्यांसाठी नाही, तर देशासाठी घातक आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी यापूर्वी केला होता. 

टिकरी सीमेवर शेतकरी आंदोलकानं घेतला गळफास; 'सुसाइड नोट'मध्ये मोदींचा उल्लेख

दरम्यान, शेतकऱ्यांनी पुकारलेले चक्का जाम आंदोलन शांततेत पार पडले. उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर, उत्तराखंडमध्ये या भागांमध्ये चक्का जाम आंदोलन केले गेले नाही. मात्र, उर्वरित देशभरात आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. बंगळुरू, अमृतसर, संगरूर, जम्मू, पठाणकोट यांसारख्या अनेक ठिकाणी चक्का जाम आंदोलनात सक्रीय सहभागी होत शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरले. शनिवारी दुपारी १२ ते ०३ या कालावधीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारFarmers Protestशेतकरी आंदोलन