शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

राहुल गांधी म्हणाले, "भारत आता लोकशाही असलेला देश राहिला नाही: स्वीडनच्या संस्थेच्या अहवालाचा दिला हवाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 18:24 IST

अमेरिकेची संस्था फ्रीडम हाऊसनंतर आता स्वीडनची संस्था वी-डेमोक्रेसीनं भारतातील लोकशाहीबद्दल व्यक्त केली चिंता. पाहा काय म्हटलंय या अहवालात भारताबद्दल

ठळक मुद्देस्वीडनची संस्था वी-डेमोक्रेसीनं भारतातील लोकशाहीबद्दल व्यक्त केली चिंताभारताचा निवडणूक हुकुमशाही असलेला देश असा उल्लेख

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील संस्था फ्रीडम हाऊसनं लोकशाही असलेल्या देशांचा अहवाल सादर केला होता. यामध्ये भारताच्या क्रमांकात घसरण झाली होती. त्यानंतर आता स्वीडनमधील व्ही-डेमोक्रसी नावाच्या एका संस्थेनं लोकशाही बाबत एक अहवाल सादर केला आहे. या संस्थेच्या अहवालाचा हवाला देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आता भारत हा लोकशाही असेलेला देश राहिला नसल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी एका वृत्ताचा स्क्रिनशॉट आपल्या ट्विटर अकाऊंटवरून करत हे वक्तव्य केलं. राहुल गांधी यांनी जो स्क्रिनशॉट शेअर केला आहे त्यात व्ही-डेमोक्रसीद्वारे (व्हरायटी ऑफ डेमोक्रसी) जारी केलेल्या एका रिपोर्टचा हवाला दिला आहे. यामध्ये भारत आता हुकुमशाही असलेला देश बनला आहे, जितका पाकिस्तान आहे, असं नमूद केलं आहे. तसंच या रिपोर्टमध्ये भारत हा बांगलादेशपेक्षाही खराब असल्याचं नमूद केलं आहे. अमेरिकेतील संस्था फ्रीडम हाऊसच्या अहवालाच्या एका आठवड्यानंतरच स्वीडनची संस्था व्ही-डेमोक्रसची अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी भारतातील लोकशाहीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसंच त्यांनी भारताला इलेक्टोरल ऑटोक्रेसी म्हणजेच निवडणूक हुकुमशाही असलेल्या देशांच्या यादीत सामील केलं आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या संस्थेनं सादर केलेल्या अहवालानंतर भारतानंही प्रतिक्रिया देत तो अहवाल चुकीचा आणि अयोग्य असल्याचं म्हटलं. काय म्हटलंय व्ही-डेमोक्रसीमध्ये ?'ऑटोक्रेटायधेशन गोझ व्हायरल' या मथळ्याखाली स्वीडनच्या संस्थेनं आपला अहवाल सादर केला आहे. यामध्ये भारताला सर्वात मोठ्या लोकशाहीच्या यादीतून काढून निवडणूक हुकुमशाही असलेला देश म्हटलं आहे. यासाठी त्यात भारत हा माध्यमांवर अंकुश ठेवणारा, मानहानी आणि राजद्रोहाच्या कायद्यांचा गरजेपेक्षा जास्त वापर करणारा असल्याचं कारम सांगितलं आहे. या अहवालानुसार भारतानं २०१३ मध्ये ०.५७ (० ते १ दरम्यान गुण मिळवले होतं. परंतु आता भारताला केवळ ०.३४ गुण देण्यात आले आहे. सेन्सरशिपच्या प्रकरणात भारत हा पाकिस्तानइतकाच निरंकुश आहे. तसंच त्याची कामगिरी ही बांगलादेश आणि नेपाळपेक्षाही खराब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आपल्या टीकाकारांना शांत करण्यासाठी राजद्रोह, मानहानी आणि काऊंटर टेररिजमच्या कायद्यांचा वापर करत आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आतापर्यंत ७ हजार लोकांविरोधात राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी सर्वाधिक हे सत्ताधारी पक्षाचे टीकाकारच आहेत, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाIndiaभारतdemocracyलोकशाही