शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

'देशाच्या सुरक्षेशी खेळ, मिस्टर 56 इंच घाबरले'; राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 15:48 IST

'हिंदुत्व आणि हिंदू धर्म भिन्न आहेत, भाजप-आरएसएसने भारतात द्वेष पसरवला.'

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारकडे सुरक्षेबाबत कोणतीही रणनीती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असून, सीमेवर प्राणाची बाजी लावून सैनिक देशाचे रक्षण करत आहेत. तर सरकार खोट बोलत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

ट्विटरवर या संदर्भात पोस्ट करत त्यांनी लिहिले की, 'मोदी सरकारकडे कोणतीही रणनीती नाही. आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी गुन्हेगारी खेळ केला जात आहे. ते Mr. 56 इंच घाबरले आहेत. सरकार खोट बोलत आहे. माझ्या संवेदना आपल्या जीवावर खेळून सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत आहेत', अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले.

'हिंदू धर्म आणि हिंदुत्व वेगळे आहेत' 

तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी आज(शुक्रवार) पक्षाच्या डिजीटल 'जन जागरण अभियाना'चे उद्घाटन केले. या दरम्यान त्यांनी हिंदू धर्म आणि हिंदूत्व वेगवेगळ्या असल्याचं मत मांडलं. आज लोक हिंदू धर्म आणि हिंदुत्वाला एकच समजू लागले आहेत. मात्र, वास्तवात या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्ही हिंदू असाल तर तुम्हाला हिंदुत्वाची काय गरज? भाजप-आरएसएसने भारतात द्वेष पसरवला आहे. आमची विचारधारा ही प्रेम आणि बंधुभावाची आहे. 

भारतात काँग्रेसची विचारधारा गरजेचीराहुल गांधी पुढे म्हणाले की, भारतात दोन विचारधारा आहेत, एक काँग्रेस पक्षाची आणि एक आरएसएसची विचारधारा. आजच्या भारतात भाजप-आरएसएसने द्वेष पसरवला आहे आणि एकता, बंधुता आणि प्रेमाची काँग्रेसची विचारधारा भाजपच्या द्वेषी विचारसरणीने झाकोळली आहे, हे मान्य करावेच लागेल. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ