शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शशी थरूरही आग्रही; संदीप दीक्षितांचे केले समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 15:39 IST

थरूर यांनी संदीप दीक्षित यांच्या समर्थनार्थ एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, संदीप दीक्षित यांनी तेच म्हटलं आहे, जे देशभरातील अनेक नेते एकट्यात म्हणतात.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडीसाठी होत असलेल्या दिरंगाईवर आक्षेप घेत संदीप दीक्षित यांना समर्थन दिले आहे. थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यामुळे पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल, असंही त्यांचे म्हणणे आहे. 

थरूर यांनी संदीप दीक्षित यांच्या समर्थनार्थ एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, संदीप दीक्षित यांनी तेच म्हटलं आहे, जे देशभरातील अनेक नेते एकट्यात म्हणतात. यापैकी अनेक नेते पक्षात मोठ्या पदावर आहेत. त्यामुळे काँग्रेस वर्कींग कमिटीला मी विनंती करतो की, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी आणि मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वासाठीची निवडणूक घ्यावी. 

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस पक्षाला नेतृत्वाची गरज असल्याचे म्हटले होते. सध्या काँग्रेस पक्षासमोर सर्वात मोठे आव्हान नेतृत्व निवडण्याचे आहे. अनेक दिवसांपासून पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. किंबहुना शोधण्यात यश आले नाही. मांजरीच्या गळ्यात घंटा बांधावी कोणी याच गर्तेत सर्व नेते असल्याचे दीक्षित यांनी म्हटले होते. त्यांना आता थरूर यांचे समर्थन मिळाले आहे. 

सध्याच्या घडीला काँग्रेस पक्षात सहा ते आठ लोक आहेत, जे पक्षाचं नेतृत्व करू शकतात. राज्यसभेत असलेले आणि माजी मुख्यमंत्री असणाऱ्या नेत्यांनी जबाबदारी स्वीकारायला हवी. सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आता या नेत्यांनी समोर येऊन पक्षाला उभारी देण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे दीक्षित यांनी सांगितले होते.