शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

“मुंबई हल्ल्यानंतर पाकवर कारवाई न करणे कमकुवतपणाचे लक्षण”; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 10:38 IST

मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तावर आक्रमकपणे कठोर कारवाई करायला हवी होती. पण मनमोहन सरकार निष्क्रिय राहिले, अशी टीका करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता १३ वर्षे होत आहेत. याच पार्श्वभूमीवर एका काँग्रेस नेत्याने पक्षाला घरचा आहेर देत तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई हल्ल्यानंतर मनमोहन सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही. कारवाई न करणे कमकुवतपणाचे लक्षण होते, अशी टीका करण्यात आली आहे. 

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी आपल्या एका पुस्तकात पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारने मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई न केल्याबाबत हल्लाबोल केला आहे. मनिष तिवारी आपल्या पुस्तकात म्हणतात की, एखाद्या देशाला (पाकिस्तान) निर्दोष नागरिकांची क्रूरपणे हत्या करण्याची खंत वाटत नाही, तर संयम ही ताकदीचे नाही, तर कमकुवतपणाचे लक्षण आहे, असे मनिष तिवारी यांनी म्हटले आहे. 

शब्दांपेक्षा कठोर कारवाईने उत्तर द्यायला हवे होते

२६/११ हल्ल्यानंतर एक मोठी संधी होती, जिथे शब्दांपेक्षा कठोर कारवाई करून जशास तसे उत्तर द्यायला हवे होते, असे सांगत मनिष तिवारी यांनी मुंबई हल्ल्याची तुलना ९/११ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याशी केली आहे. अमेरिकेने जशी तीव्र आणि आक्रमक कारवाई केली, तशी भारतानेही करायला हवी होती, या शब्दांत मनिष तिवारी यांनी पक्षाच्या भूमिकेवर टीका केली. यापूर्वीही मनिष तिवारी यांनी पंजाबमधील राजकीय अस्थिरतेवरून काँग्रेस पक्षाला घरचा आहेर ते टीका केली होती. तसेच कन्हैय्या कुमारला काँग्रेस पक्षाने दिलेल्या प्रवेशावरूनही मनिष तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

दरम्यान, मनिष तिवारी यांच्यानंतर भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही यूपीए सरकारवर टीका केली आहे. मनिष तिवारी यांनी २६/११ च्या संदर्भात स्पष्ट केलेली भूमिका योग्य आहे. यूपीए सरकारचा तो कमकुवतपणाच होता. तेव्हाचे एअर चीफ मार्शल फली मेजन यांनीही वायुसेना कारवाई करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. मात्र, यूपीएच्या मनमोहन सिंग सरकारने तसे करू दिले नाही. २६/११ च्या कारवाईनंतर यूपीए सरकार हिंदूंना दोषी ठरवण्यात आणि पाकिस्तानचा बचाव करण्यात व्यस्त होते, अशी घणाघाती टीका पूनावाला यांनी केली आहे.  

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाManmohan Singhमनमोहन सिंगcongressकाँग्रेस