शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 22:12 IST

Lok Sabha Election 2024: भाजपा उद्योगपतींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना करोडपती बनवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला दिले. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या उपस्थितीत इंडिया आघाडीची आज दिल्लीत सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच, संविधानाचे रक्षण करणे हे काँग्रेस पक्षाचे ध्येय आहे. कारण हेच देशातील जनतेचे भविष्य, त्यांचे स्वप्न आणि त्यांच्या हृदयाचा आवाज आहे, असे राहुल गांधी म्हणाले. 

या संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय आहे. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे संविधान नको आहे. त्यामुळे पहिले काम या संविधानाचे रक्षण करणे आहे, कारण हे तुमचे भविष्य आहे. तुझे स्वप्न आणि तुझ्या हृदयाचा आवाज आहे, असे राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच, भाजपा उद्योगपतींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना करोडपती बनवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला दिले. 

राहुल गांधी म्हणाले, "मीडियाच्या मित्रांनो, तुम्ही शेतकरी, छोटे व्यापारी, तरुण, मजुरांचे मित्र नाही. तुम्ही फक्त अदानी-अंबानींसारख्या 2-3 अब्जाधीशांचे मित्र आहात. पण मला खात्री आहे, तुम्ही भारत आघाडीलाच मतदान कराल." तसेच, भाजपा सरकारने कामगारांचे एक रुपयाही कर्ज माफ केले नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही तर आपल्या उद्योगपती मित्रांचे १६ लाख कोटी रुपये माफ केले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

पुढे राहुल गांधी म्हणाले, "मोदीजींनी काही उद्योगपती बनवले, पण आम्ही महालक्ष्मी योजनेत लोकांना करोडपती बनवू. काही पत्रकारांनी मला आणि नरेंद्र मोदीजींना पत्रे लिहून लोकशाहीत वाद व्हायला हवा, असे सांगितले. त्यांनी नरेंद्र मोदींना सांगितले की, तुम्ही राहुल गांधींसोबत चर्चेत सहभागी व्हायला हवे. मी नरेंद्र मोदींसोबत कधीही चर्चा करायला तयार आहे, पण नरेंद्र मोदी माझ्याशी चर्चा करणार नाहीत."

दरम्यान, तुमचा अदानीशी काय संबंध आहे? तुम्ही इलेक्टोरल बाँड्सच्या नावावर 'डोनेशन बिझनेस' का चालवत आहात? शेतकऱ्यांवर काळे कायदे का आणले? कोरोनाने लोक मरत असताना थाळी वाजवायला का सांगितले? तुम्ही शी जिनपिंगला झुलवले, मग त्यांच्या सैन्याने भारताची भूमी कशी काबीज केली? तुम्ही अग्निवीर योजना का आणली? असे प्रश्न नरेंद्र मोदी चर्चेसाठी आले तर विचारेन असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीdelhi lok sabha election 2024दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस