शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'महाराष्ट्राचा विकास होत असताना भाजपाचे नेते 'शाखां'मध्ये होते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 17:52 IST

महाराष्ट्राचा विकास होत असताना भाजपाचे आजचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये लाठ्या-काठ्या फिरवित होते, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार हुसैन दलवाई यांनी लगावला आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्राचा विकास होत असताना भाजपाचे आजचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये लाठ्या-काठ्या फिरवित होते, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार हुसैन दलवाई यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही, असा आरोप भाजपाचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. यावरून महाराष्ट्रात वाद सुरू झाला आहे. छाननी समितीच्या बैठकीसाठी हजर राहिल्यानंतर या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार हुसैन दलवाई म्हणाले, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने या राज्याची बांधणी राज्यातील नेत्यांनी अत्यंत धोरणीपणाने केली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. यामागे केवळ एका राज्याची निर्मिती नव्हती तर पुरोगामी व विकासशील महाराष्ट्र घडविण्याचा दृढसंकल्प करून ते आले होते. 

हाच वारसा पुढे वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख यांनी चालविला. या नेत्यांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्र हे देशातील अव्वल राज्य घडले आहे. महाराष्ट्राने सर्व क्षेत्रात प्रगती केली. हे गेल्या पाच वर्षातील देण नाही. महाराष्ट्र विकासाची एक एक पल्ला गाठत होता, त्यावेळी आजचे भाजपचे नेते संघ शाखांमध्ये लाठ्या-काठ्या फिरवित होते. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास कसा झाला, याची माहिती या नेत्यांना नाही, असा टोला त्यांनी हाणला.

 

टॅग्स :Hussein Dalwaiहुसेन दलवाईcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMaharashtraमहाराष्ट्र