शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वायनाडमधून प्रियंका गांधी किती मतांनी विजयी होतील? पोटनिवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 08:23 IST

Pramod Tiwari On Priyanka Gandhi : काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी या निर्णयाबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून हा योग्य निर्णय असल्याचे म्हटले आहे.   

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या दोन्ही मतदारसंघातून ते बहुमताने निवडून आले आहेत. मात्र, आता राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला असून ते रायबरेली मतदारसंघातून आपली खासदारकी कायम ठेवणार आहेत. तर राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी या वायनाडमधून आता पोटनिवडणूक लढविणार आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी या निर्णयाबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून हा योग्य निर्णय असल्याचे म्हटले आहे.   

प्रमोद तिवारी म्हणाले, मला राहुल गांधी यांचे आभार मानायचे आहेत, त्यांनी रायबरेली मतदारसंघातून खासदार राहण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. तर प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. अशा प्रकारे दोन्ही सदस्यांचे प्रतिनिधित्व असणार आहे. या निर्णयाने त्यांनी इंडिया आघाडीला ८० पैकी ४३ जागा देणाऱ्या उत्तर प्रदेशच्या जनादेशाचाही सन्मान केला आहे. तसेच, त्यांनी उत्तर प्रदेशच्या भावनांचाही आदर केला आहे. तर प्रियंका गांधी या वायनाडमधून ५ लाख मतांनी विजयी होतील, असा दावा प्रमोद तिवारी यांनी केला आहे.

दरम्यान, याआधी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडण्याचा आणि प्रियंका गांधी तिथून पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याशिवाय काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि प्रियांका गांधीही उपस्थित होत्या.

प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणातप्रियंका गांधी या वायनाड पोटनिवडणुकीत विजयी झाल्या तर त्या पहिल्यांदाच खासदार म्हणून संसदेत प्रवेश करतील. दरम्यान, प्रियंका गांधी या २०१९ मध्ये सक्रिय राजकारणात आल्यापासून अमेठी, रायबरेली आणि वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची सतत चर्चा होत होती. त्या काँग्रेसट्आ उत्तर प्रदेशमधील प्रभारी आहेत. तसेच, काँग्रेसच्या रणनीतीकार आणि स्टार प्रचारक म्हणून ओळखल्या जातात. अलीकडेच त्यांनी काही राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाला मोलाची साथ दिली आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीwayanad-pcवायनाडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी