शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

“बेरोजगारी अन् महागाई हेच संसद घुसखोरीचे मुख्य कारण”; राहुल गांधींची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 2:21 PM

Lok Sabha Security Breach Parliament Attack: पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे तरुणांना रोजगार मिळत नसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

Lok Sabha Security Breach Parliament Attack: संसदेत घुसखोरी प्रकरणी विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपासून संसदेतील गोंधळ कायम आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी १३ डिसेंबरच्या घटनेवर सभागृहात उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. मात्र, सरकारकडून सभागृहात कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही. गृहमंत्री शाह सभागृहात येऊन संपूर्ण घटनेवर निवेदन करत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू शकणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. संसद घुसखोरी प्रकरणी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी थेट शब्दांत भाष्य केले. 

असे का घडले? मुख्य मुद्दा बेरोजगारी आहे. बेरोजगारीचा मुद्दा संपूर्ण देशभरात आहे. पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही. संसदेत घुसखोरी होण्याची घटना झाली, त्यामागे बेरोजगारी आणि महागाई हेच कारण आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 

गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन निवेदन द्यावे

हा गंभीर विषय आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन निवेदन द्यावे, हीच मागणी संसदेत वारंवार केली जात आहे. मात्र, गृहमंत्र्यांना यायचे नाही आणि निवेदन द्यायचे नाही. ते (भाजप) सभागृहाचे कामकाज चालू द्यायला तयार नाहीत. ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही पण ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्यांच्याशी बोलण्यात अर्थ नाही. ते (भाजप) काँग्रेसचे नाव घेऊन आणि नेहरू-गांधींना शिव्या देऊन मते मागतात. त्यांचे काम म्हणजे आम्हाच्यावर टीका करून मते मिळवणे हेच आहे, या शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. 

दरम्यान, संपूर्ण विरोधी गट ‘इंडिया’ची एकच मागणी आहे की, सुरक्षेत त्रुटी कशा राहिल्या, हे सरकारने सभागृहाला सांगावे. प्रत्यक्षात या घटनेपासून आतापर्यंत दिल्ली पोलिसांनीही मौन बाळगले आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. विरोधी सदस्यांनी सतत गदारोळ केल्यामुळे शुक्रवारी लोकसभा आणि राज्यसभेत एका मिनिटांत कामकाज ठप्प पडले. यामुळे गुन्हेगारी कायद्यांची जागा घेणारी तीन विधेयके रखडली. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस