शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"जगभर फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत..." काँग्रेसची पीएम नरेंद्र मोदींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 19:15 IST

Congress : "पंतप्रधानांनी राज्यसभेत मणिपूरबद्दल जे सांगितले, ते वास्तवाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे."

Congress on PM Modi Speech: संसदेच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (3 जुलै) मणिपूर हिंसाचारावर भाष्य केले होते. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. मात्र, आता काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधानांच्या मणिपूरवरील वक्तव्यावर हल्लाबोल केला आहे. 

जयराम रमेश म्हणाले की, "पंतप्रधान मणिपूरच्या मुद्द्यावर गप्प का बसले? त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली नाही? त्यांनी खासदार आणि आमदारांशी का चर्चा केली नाही? त्यांनी यापूर्वीच या घटनेवर बोलायला हवे होते. ते वेगवेगळ्या देशांना भेटी देतात, पण त्यांना मणिपूरला जायला वेळ नाही. यावरुन पंतप्रधानांना परिस्थितीची कितीची चिंता नाही, असा संदेश जातो."

"पंतप्रधानांनी राज्यसभेत मणिपूरबद्दल जे सांगितले, ते वास्तवाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. मणिपूर 3 मे 2023 पासून जळत आहे. समुदायांमध्ये तणाव आणि हिंसाचार सुरू आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना राज्यात दोन तृतीयांशपेक्षा जास्त मते मिळाले, पण आजपर्यंत पंतप्रधानांनी मणिपूरचा दौरा केला नाही. मणिपूरचे लोक आजही पंतप्रधान का येत नाही, अशी विचारणा करतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातही मणिपूरचा फारसा उल्लेख नव्हता. हा दांभिकपणा आहे," अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसBJPभाजपाParliamentसंसद