शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

राहुल गांधी दिल्लीत काढणार न्याय यात्रा; काँग्रेस केजरीवाल-भाजपला करणार लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 15:13 IST

काँग्रेसकडून दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Congress Nyay Yatra : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राहुल गांधींनी आता दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात १४ जानेवारी ते ३० मार्च दरम्यान मणिपूर ते महाराष्ट्र अशी भारत न्याय यात्रा काढली होती. आता काँग्रेस २३ ऑक्टोबरपासून दिल्लीत न्याय यात्रा काढण्याच्या तयारीत आहे. या न्याय यात्रेदरम्यान दिल्लीतील भाजपच्या तीन वेळा विजयी खासदारांच्या अपयशाचा मुद्दा ठळकपणे मांडणार आहे.

काँग्रेसची न्याय यात्रा २३ ऑक्टोबरपासून दिल्लीतून सुरू होणार आहे. या यात्रेत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सहभागी होणार आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा २३ ऑक्टोबरपासून सुरू होऊन २८ नोव्हेंबरला संपेल. काँग्रेस न्याय यात्रेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत ही यात्रा २३ ते २८ ऑक्टोबर दरम्यान निघणार आहे. त्यानंतर ४ ते १० नोव्हेंबर,१२ ते १८ नोव्हेंबर आणि शेवटच्या टप्प्यात २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत निघणार आहे.

यासोबतच मोदी सरकार, दिल्लीचे नायब राज्यपाल आणि आप सरकार यांच्यातील वादावर देखील न्याय यात्रेतून प्रकाश टाकला जाणार आहे. केजरीवाल सरकार आणि आपचे मद्य धोरण प्रकरणाला लक्ष्य करण्याबरोबरच त्यांच्या धोरणांवरही काँग्रेसकडून निशाणा साधला जाणार आहे. पंजाब आणि हरियाणाच्या धर्तीवर दिल्लीतही काँग्रेस आणि आपमध्ये युती होणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे न्याय यात्रेतून काँग्रेसला निवडणुकीत मोठा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.

या यात्रेदरम्यान, काँग्रेसकडून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली जाणार आहे. आप सरकारवरला घेरण्यासाठी काँग्रेस पक्ष विविध मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात प्रदर्शनांचे आयोजन करणार आहे. याशिवाय विविध अहवालातून आलेली माहिती  लोकांसमोर मांडण्यात येणार आहे. असं असले तरी केजरीवाल यांचा आप पक्ष केंद्रातील इंडिया आघाडीचा भाग राहणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पुढच्या वर्षी दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२५ मध्ये संपणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच नोव्हेंबरमध्ये दिल्लीत निवडणुका घेण्याची मागणी केली होती. केजरीवाल यांनी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसोबतच येथेही निवडणुका घ्याव्यात, असे म्हटले होते.

कशी असणार न्याय यात्रा?

पहिला टप्पा- २३ ते २८ ऑक्टोबरदुसरा टप्पा- ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरतिसरा टप्पा- १२ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबरचौथा टप्पा- २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर

टॅग्स :congressकाँग्रेसdelhiदिल्लीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी