शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'वन नेशन, वन इलेक्शन'वर मल्लिकार्जुन खरगे यांचे उत्तर; म्हणाले, 'काँग्रेसचा विरोध...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 15:42 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 'वन नेशन वन इलेक्शन'वर आपली प्रतिक्रीया दिली आहे.

देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून दुसरीकडे 'वन नेशन, वन इलेक्शन'ची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रीया दिली असून त्यांनी विरोध केला आहे. खरगे  म्हणाले की, 'वन नेशन, वन इलेक्शन ' या कल्पनेला आमचा विरोध आहे. खरगे यांनी 'वन नेशन वन इलेक्शन' या उच्चस्तरीय समितीच्या सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. 'वन नेशन वन इलेक्शन' या कल्पनेला काँग्रेसचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

मागील बुधवारी माजी राष्ट्रपती आणि 'वन नेशन, वन इलेक्शन' या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख रामनाथ कोविंद यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन चर्चा सुरू केली होती. निवृत्त न्यायाधीशांसह समितीने या विषयावर लोकांचे मत मागितल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या बैठका झाल्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हे पत्र लिहिले आहे. 

२१ तारखेपर्यंत आत्मसमर्पण करा; बिल्किस बानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे आरोपींना स्पष्ट आदेश

'वन नेशन, वन इलेक्शन' या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख राष्ट्रपती कोविंद यांनी बुधवारी दिल्लीत मद्रास उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मुनीश्वर नाथ भंडारी यांची भेट घेतली. वन नेशन वन इलेक्शनवर चर्चा सुरू ठेवत, उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गोर्ला रोहिणी आणि माजी सीईसी सुशील चंद्र यांच्याशी चर्चा केली, असे निवेदनात म्हटले आहे.

चंद्रा आणि न्यायमूर्ती रोहिणी यांनी कोविंद यांची भेट घेतली तेव्हा कायदा सचिव नितेन चंद्राही उपस्थित होते. चंद्रा हे उच्चस्तरीय समितीचे सचिवही आहेत. येत्या काही दिवसांतही सल्लामसलत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या कल्पनेचे समर्थन केले आणि सांगितले की ते चांगले प्रशासन करण्यास मदत करेल कारण सरकारांना धोरणे तयार करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.

देशात एकाच वेळी निवडणुका घेतल्याने जनतेची गैरसोय कमी होईल, मानवी संसाधनांचा वापर सुधारेल आणि वारंवार निवडणुका घेण्यावर होणारा खर्च कमी होईल, असेही त्यांनी सांगितल्याचे समजते. समितीने या विषयावर सामान्य जनता आणि राजकीय पक्षांकडून आधीच सूचना मागवल्या आहेत आणि त्यावर विचारही केला आहे. सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयांचे माजी मुख्य न्यायमूर्ती, घटनातज्ज्ञ आणि माजी सीईसींसह प्रख्यात कायदेतज्ज्ञांनाही त्यांचे मत जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपा