शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

'वन नेशन, वन इलेक्शन'वर मल्लिकार्जुन खरगे यांचे उत्तर; म्हणाले, 'काँग्रेसचा विरोध...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 3:39 PM

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 'वन नेशन वन इलेक्शन'वर आपली प्रतिक्रीया दिली आहे.

देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून दुसरीकडे 'वन नेशन, वन इलेक्शन'ची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रीया दिली असून त्यांनी विरोध केला आहे. खरगे  म्हणाले की, 'वन नेशन, वन इलेक्शन ' या कल्पनेला आमचा विरोध आहे. खरगे यांनी 'वन नेशन वन इलेक्शन' या उच्चस्तरीय समितीच्या सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. 'वन नेशन वन इलेक्शन' या कल्पनेला काँग्रेसचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

मागील बुधवारी माजी राष्ट्रपती आणि 'वन नेशन, वन इलेक्शन' या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख रामनाथ कोविंद यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन चर्चा सुरू केली होती. निवृत्त न्यायाधीशांसह समितीने या विषयावर लोकांचे मत मागितल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या बैठका झाल्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हे पत्र लिहिले आहे. 

२१ तारखेपर्यंत आत्मसमर्पण करा; बिल्किस बानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे आरोपींना स्पष्ट आदेश

'वन नेशन, वन इलेक्शन' या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख राष्ट्रपती कोविंद यांनी बुधवारी दिल्लीत मद्रास उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मुनीश्वर नाथ भंडारी यांची भेट घेतली. वन नेशन वन इलेक्शनवर चर्चा सुरू ठेवत, उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गोर्ला रोहिणी आणि माजी सीईसी सुशील चंद्र यांच्याशी चर्चा केली, असे निवेदनात म्हटले आहे.

चंद्रा आणि न्यायमूर्ती रोहिणी यांनी कोविंद यांची भेट घेतली तेव्हा कायदा सचिव नितेन चंद्राही उपस्थित होते. चंद्रा हे उच्चस्तरीय समितीचे सचिवही आहेत. येत्या काही दिवसांतही सल्लामसलत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या कल्पनेचे समर्थन केले आणि सांगितले की ते चांगले प्रशासन करण्यास मदत करेल कारण सरकारांना धोरणे तयार करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.

देशात एकाच वेळी निवडणुका घेतल्याने जनतेची गैरसोय कमी होईल, मानवी संसाधनांचा वापर सुधारेल आणि वारंवार निवडणुका घेण्यावर होणारा खर्च कमी होईल, असेही त्यांनी सांगितल्याचे समजते. समितीने या विषयावर सामान्य जनता आणि राजकीय पक्षांकडून आधीच सूचना मागवल्या आहेत आणि त्यावर विचारही केला आहे. सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयांचे माजी मुख्य न्यायमूर्ती, घटनातज्ज्ञ आणि माजी सीईसींसह प्रख्यात कायदेतज्ज्ञांनाही त्यांचे मत जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपा