शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"प्रियंका गांधी या योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा उत्तम पर्याय आणि हेच वास्तव" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 13:30 IST

Congress Priyanka Gandhi And Yogi Adityanath : सलमान खुर्शीद यांनी लखनौमध्ये निवडणूक जाहीरनाम्यासंदर्भात विभागीय स्तरावरील बैठकीनंतर आपलं मत नोंवदलं.

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात (UP Assembly Election 2022) एक मोठं विधान केलं आहे. खुर्शीद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या तुलनेत प्रियंका गांधी या उत्तम पर्याय असल्याचं म्हटलं आहे. इंडियन एक्सप्रेशशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. "भविष्यामध्ये निवडणूक कोण जिंकणार हे निश्चित होईलच. मात्र प्रियंका गांधी या योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा उत्तम पर्याय आहेत आणि हेच वास्तव आहे" असं सलमान खुर्शीद म्हणाले आहेत. तसेच भाजपा सरकारने अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या खोट्या तक्रारी मागे घेण्याचा आम्ही प्रयत्न करू असंही म्हटलं आहे. 

सलमान खुर्शीद यांनी लखनौमध्ये निवडणूक जाहीरनाम्यासंदर्भात विभागीय स्तरावरील बैठकीनंतर आपलं मत नोंदवलं. "प्रियंका गांधी लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि लोकांना आश्वासन देत आहेत की उत्तर प्रदेश एक उत्तम आणि पारदर्शक सरकारची स्थापना केली जाणार आहे" असं खुर्शीद यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांना प्रियंका गांधी योगी आदित्यनाथ यांना टक्कर देऊ शकतात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, "भविष्यामध्ये दिसून येईलच की कोण निवडणूक जिंकणार आहे. प्रियंका गांधींचा चेहरा हा त्यांच्यापेक्षा (योगींपेक्षा) फार उत्तम आहे आणि हेच सत्य आहे" असं सांगितलं आहे. 

"जाहीरनामा हे आमचं धोरण"

काँग्रेसच्या जाहिरनाम्यासंदर्भात निर्णय घेणाऱ्या समितीचे सदस्य असणाऱ्या खुर्शीद यांनी काँग्रेस दिवाळीनंतर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा जाहीनामा घोषित करणार असल्याचं म्हटलं आहे. "आम्ही विभागीय स्तरावर बैठकी सुरू केल्या आहेत. रविवारी अशीच एक बैठक लखनौमध्ये झाली. कोरोना कालावधीमध्ये आम्ही अनेकांसोबत तज्ज्ञांसोबत ऑनलाईन माध्यमातून बैठकी घेतल्या आहेत. परिस्थिती सध्या सुधारली आहे तर आम्ही प्रत्यक्षात लोकांच्या बैठकी घेत आहोत. त्यांच्या अडचणी ऐकून त्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय. जाहीरनामा हे आमचं धोरण आहे. जेव्हा लोक हा जाहीरनामा पाहतील तेव्हा त्यांना हे जाहीरनामा आपल्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करतोय असं वाटलं पाहिजे" असं खुर्शीद यांनी म्हटलं आहे. 

"भाजपा सरकारने अनेकांविरोधात दाखल केले खोटे गुन्हे"

खुर्शीद यांनी काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात येतील असंही सांगितलं. "भाजपा सरकारने अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या खोट्या तक्रारी मागे घेण्याचा आम्ही प्रयत्न करू जेथे कायद्याचा दुरुपयोग करण्यात आला आहे. मग हे गुन्हे चकमकीचे असो किंवा बेकायदेशीरपद्धतीने घरं पाडण्याचे असो किंवा अटकेसंदर्भातील असो आम्ही न्याय देण्यासाठी प्रयत्न करू" असं देखील खुर्शीद यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसsalman khurshidसलमान खुर्शिदPoliticsराजकारण