शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

Priyanka Gandhi : "डाळीची किंमत सामान्य लोकांना माहितीय; मंत्री, अधिकारी अयोध्येतील जमिनीची किंमत शोधण्यात व्यस्त"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 10:02 IST

Congress Priyanka Gandhi : प्रियंका गांधी यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषीमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

योगी आदित्यनाथ सरकारमधील कृषीमंत्री सूर्य प्रताप शाही यांनी डाळींच्या किमतीवर विधान केलं आहे. ज्यामुळे राजकारण तापलं आहे. त्यांच्या या विधानावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याच दरम्यान प्रियंका गांधी यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषीमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे 

"पीठ आणि डाळीची किंमत तर सर्वसामान्य लोकांना माहीत आहे, मंत्री आणि अधिकारी अयोध्येतील जमिनीची किंमत शोधण्यात व्यस्त होते" असं म्हणत प्रियंका गांधी यांनी खोचक टोला लगावला आहे. तसेच त्यांनी यासोबतच एक पोस्टर देखील शेअर केलं आहे. ज्यामध्ये एका रिपोर्टचा हवाला देण्यात आला आहे. 

"२०१९ मध्ये रामजन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिराच्या शेजारील २५ गावांमध्ये २५०० हून अधिक प्लॉटची खरेदी, विक्री केली गेली. ज्यामध्ये जमीन विकत घेतलेल्या अनेक लोकांच्या अशा लिंक उघड झाल्या जे एकतर राजकारणी किंवा अधिकारी किंवा स्थानिक नेते होते."

"यासोबतच डाळींचा भाव १०० रुपये किलो आहे असं म्हणून हसणारे मंत्री सूर्य प्रताप शाही यांनी ही दराची यादी पाहावी" असं पोस्टरमध्ये म्हटलं आहे. तूर डाळ १८० रुपये किलो, राजमा १७० रुपये किलो, काळे उडीद १३० रुपये किलो, मूग डाळ १२० रुपये, असा बाजारात भाव आहे" असंही म्हटलं आहे.

यूपीच्या कृषीमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, डाळीचे दर १०० रुपये किलोपेक्षा जास्त नाहीत. १०० रुपये किलो दराने डाळ उपलब्ध आहे. यावर पत्रकारांनी त्यांना १०० रुपये किलोची डाळ कुठे मिळते?, असा प्रश्न विचारला असता मंत्री सूर्य प्रताप शाही हसू लागले. प्रियांका गांधी यांनी कृषीमंत्र्यांच्या या विधानावर आता जोरदार निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश