शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

५०० रुपयांत गॅस देऊ, दिल्लीत काँग्रेसचे आश्वासन; ३०० युनिटपर्यंतची वीजही मिळणार मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 05:30 IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांत जनतेने आम्हाला विजयी केले तर दिल्ली शहरातील नागरिकांना ५०० रुपयांमध्ये सीएनजी सिलिंडर देण्याची तसेच रेशन कीट व ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे आश्वासन काँग्रेसने गुरुवारी दिले. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव उपस्थित होते.

ए. रेवंथ रेड्डी म्हणाले की, काँग्रेसने दिलेल्या पाच हमी दिल्लीत सत्तेत आल्यानंतर नक्की पूर्ण करण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल या दोघांनीही दिल्लीच्या विकासासाठी काहीही काम केलेले नाही. काँग्रेसने प्यारी दीदी योजनेद्वारे महिलांना प्रत्येक महिन्याला २५०० रुपयांची मदत, जीवन रक्षण योजनेद्वारे नागरिकांना २५ लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, सुशिक्षित बेरोजगारांना वर्षभराच्या काळात दरमहा ८५०० रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे, असे रेवंथ रेड्डी यांनी सांगितले.

स्मृती इराणी यांना भाजपने मैदानात उतरविलेच नाहीमाजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविणार असल्याच्या चर्चेला गुरुवारी भाजपने उमेदवारांची चौथी यादी जाहीर करताच पूर्णविराम मिळाला. भाजपने युती धर्माचे पालन करीत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. पक्षाने ६८ जागांवर उमेदवार दिले असून, जनता दल युनायटेड व लोकजन शक्ती पक्षाला प्रत्येकी एक जागा दिली आहे.

एआयचा जबाबदारीने वापर व्हावा : निवडणूक आयोगनिवडणूक प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर व मतदारांना प्रभावित करण्याची तंत्रज्ञानाची क्षमता या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी दिशानिर्देश जारी केले.एआयपासून तयार केलेल्या सामग्रीचा वापर करताना पारदर्शकतेचे व जबाबदारीचे भान ठेवण्याचे निर्देश आयोगाने राजकीय पक्षांना दिले आहेत. प्रचार जाहिराती किंवा सामग्रीचा प्रसार करताना अस्वीकरणाचा (डिस्क्लेमर) देखील समावेश करावा लागणार असल्याचे आयोगाच्या दिशानिर्देशात म्हटले आहे. 

केंद्राने माफी मागावीदिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आली. त्याबद्दल केंद्र सरकारने माफी मागावी, अशी मागणी आपचे नेते संजय सिंह यांनी केली आहे. केजरीवाल व आपच्या अन्य काही नेत्यांना अवैध पद्धतीने अटक केली होती, असे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसdelhi electionदिल्ली निवडणूक