शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

"नागरिकांच्या खिशातून हिसकावून घेतलेला पैसा जातोय कुठे, 23 लाख कोटी रुपये कुठे गेले?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 17:24 IST

Congress Rahul Gandhi And Modi Government : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किंमती या गगनाला भिडत आहे. याचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. जनतेला महागाईची झळ सहन करावी लागत आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारची तुलना थेट पुरातन लोककथांमधील भरमसाठ करवसुली करणाऱ्या सत्ताधाऱ्यांशी केली आहे. तसेच सुरुवातीला जनता दुःखी असली तरी शेवटी जनता हे सरकार संपवते असा इशारा देखील दिला आहे. 

राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. मोदी सरकारने (Modi Government) गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या करातून जमा केलेले 23 लाख रुपये कुठं गेले? असा सवालही उपस्थित केला आहे. "पुरातन लोककथांमध्ये भरमसाठ करवसुली करणाऱ्या स्वार्थी सत्ताधाऱ्यांच्या गोष्टी होत्या. अशावेळी सुरुवातीला जनता दुखी होते, मात्र नंतर शेवटी हीच जनता हे सरकार संपवते. वास्तवातही असंच होणार" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच Tax Extortion) आणि Fuel Prices हे दोन हॅशटॅग देखील वापरले आहेत.

"नागरिकांच्या खिशातून जो पैसा हिसकावून घेतला जातोय तो पैसा जातोय कुठे?"

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी "केंद्र सरकारने 23 लाख कोटी रुपये जीडीपीतून कमावले आहेत. हा जीडीपी म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोल आहे. हे 23 लाख कोटी रुपये गेले कुठे हा माझा प्रश्न आहे. नागरिकांच्या खिशातून जो पैसा हिसकावून घेतला जात आहे हा पैसा कुठं जातोय हा प्रश्न जनतेने विचारायला हवा" असं म्हटलं आहे. याआधी देखील राहुल यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. 

"मंत्र्याची हकालपट्टी न करून भाजपाने न्याय प्रक्रियेत अडथळा आणला"; राहुल गांधींचा हल्लाबोल 

"मंत्र्याची हकालपट्टी न करून भाजपाने न्याय प्रक्रियेत अडथळा आणला आहे. केंद्र सरकारला ना शेतकऱ्यांच्या कुटुंबांची काळजी आहे, ना हत्या झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांची" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसेच KisanKoNyayDo हा हॅशटॅग देखील वापरला. भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. "नेतागिरी म्हणजे फॉर्च्यूनरने कोणालाही चिरडून टाकणे नाही" असं स्वतंत्र देव सिंह (BJP Swatantra Dev Singh) यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस