शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
3
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
4
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
5
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
6
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
7
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
8
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
9
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
10
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
12
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
13
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
14
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
15
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
16
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
17
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
18
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
19
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
20
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?

Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 10:19 AM

Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अयोध्येतील भाजपाच्या पराभवाचाही उल्लेख केला.

रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर राहुल गांधी आभार सभेला संबोधित करण्यासाठी मंगळवारी रायबरेली येथे पोहोचले. यावेळी राहुल यांनी अयोध्येतील भाजपाच्या पराभवाचाही उल्लेख केला. राहुल गांधी म्हणाले की, अयोध्येत पराभव झाला. अयोध्येत राम मंदिर बांधलं. त्याच्या उद्घाटनाच्या वेळी तुम्हाला गरीब माणूस दिसला नाही. त्यामुळे अयोध्येतील जनतेने त्यांना उत्तर दिलं आहे.

"अयोध्येत राम मंदिर बांधलं. एकाही गरीब व्यक्तिला निमंत्रित केलं नाही. उद्घाटनाला एकही शेतकरी, एक मजूर, एक मागासलेला व्यक्ती, एक दलित व्यक्ती दिसला नाही. आदिवासी राष्ट्रपतींना सांगण्यात आलं की तुम्ही यासाठी येऊ शकत नाही. तुम्ही पाहिलं असेल या सोहळ्यासाठी अदानी, अंबानी उभे होते, उद्योगपती उभे होते, संपूर्ण बॉलिवूड उभं होतं, क्रिकेटची टीम उभी होती, पण एकही गरीब नव्हता, याचंच उत्तर आता अयोध्येतील जनतेने दिलं आहे" असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. 

"प्रियंका गांधी वाराणसीतून लढल्या असत्या तर मोदी हरले असते"

प्रियंका गांधींनी वाराणसीतून निवडणूक लढवली असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन-तीन लाख मतांनी पराभूत झाले असते, असा दावा राहुल यांनी केला. "या निवडणुकीत भारताने संदेश दिला आहे की नरेंद्र मोदीजींचे 'व्हिजन' आम्हाला आवडत नाही. आम्हाला द्वेष नको आहे, हिंसा नको आहे. आम्हाला प्रेमाचं दुकान (मोहब्बत की दुकान) हवं आहे."

"देशासाठी नव्या 'व्हिजन'ची गरज आहे. देशाला नवी 'व्हिजन' द्यायची असेल, तर ती उत्तर प्रदेशातूनच द्यावी लागेल आणि राज्यात आणि देशात आम्हाला इंडिया आघाडी, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हवी आहे असा संदेश उत्तर प्रदेशने दिला आहे" असं देखील राहुल गांधींनी म्हटलं आहे. 

"अयोध्येतील जनतेने उत्तर दिलं आहे"

अयोध्येतील भाजपाच्या पराभवाचा संदर्भ देत राहुल म्हणाले की, "अयोध्येतील जनतेने उत्तर दिलं आहे. केवळ अयोध्येतच नाही तर वाराणसीतही असंच आहे. मी माझ्या बहिणीला (प्रियंका गांधी) सांगतोय की, तिने वाराणसीतून निवडणूक लढवली असती तर आज पंतप्रधान दोन-तीन लाख मतांनी वाराणसीची निवडणूक हरले असते."

"देशात दहा वर्षे बेरोजगारी, द्वेष आणि हिंसा पसरवली"

"मी हे उद्दामपणाने बोलत नाही, तर जनतेने पंतप्रधान मोदींना संदेश दिला आहे की आम्हाला त्यांचं राजकारण आता आवडत नाही. आम्हाला प्रगती हवी आहे. तुम्ही या देशात दहा वर्षे बेरोजगारी, द्वेष आणि हिंसा पसरवली. जनतेने पंतप्रधानांना चांगलंच उत्तर दिलं आहे." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपा