शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 09:37 IST

Congress Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा टीका केली आहे.

Congress Rahul Gandhi News: लोकसभा निवडणुकीत देशभरात झालेल्या सर्वच टप्प्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान होण्याची कामगिरी पश्चिम बंगालने सहाव्या टप्प्यातही कायम ठेवली. २५ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे सहाव्या टप्प्यातील मतदान झाले. दिल्लीतील ७ जागांवरही मतदान झाले. यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. 

दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्र्यांसह अनेक व्हीआयपींनी मतदान केले. दिल्लीत सरासरी ५७.६७ टक्के मतदान झाले. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये सर्वाधिक ६२.८७ टक्के, तर नवी दिल्लीत सर्वात कमी ५२.९३ टक्के मतदान झाले. यानंतर राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत पंतप्रधान मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.

पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालले आहे

पंतप्रधानांच्या भाषेची प्रतिष्ठा आणि भाजपाचा जागा या दोन्ही गोष्टी सातत्याने घसरत चालल्या आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमधून केली आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणतात की, देशवासियो, मतदानाच्या पहिल्या पाच टप्प्यात तुम्ही खोटेपणा, द्वेष आणि अपप्रचार यांना नाकारून तुमच्या जीवनाशी संबंधित तळागाळातील समस्यांना प्राधान्य दिले आहे. ३० लाख रिक्त सरकारी पदांवर भरती आणि तरुणांसाठी वर्षाला १ लाख रुपयांची पहिली रोजगार हमी योजना सुरू व्हावी. गरीब कुटुंबातील महिलांच्या खात्यात महिन्याला ८,५०० रुपये येऊ लागतील. शेतकरी कर्जमुक्त झाला होईल आणि त्यांना त्यांच्या पिकांवर योग्य एमएसपी मिळेल. मजुरांना ४०० रुपये रोजंदारी मिळेल. तुमचे जीवन तर सुधारेलच पण लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करेल, यासाठी मतदार म्हणून योगदान दिले, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार बिहारमधील लोकसभेच्या ८ जागांवर ५३.३० टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशमधील १४ जागांवर ५४.०३ टक्के मतदान झाले. जम्मूमधील एका जागेवर ५२.२८ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ८ जागांसाठी ७८.१९ टक्के मतदान झाले. हरयाणामधील सर्व १० जागांसाठी ५८.३७ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली. राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या ७ जागांसाठी ५४.४८ टक्के मतदान झाले. झारखंडमधील लोकसभेच्या ४ जागांसाठी ६२.७४ टक्के मतदान झाले. ओदिशामधील लोकसभेच्या ६ जागांसाठी ६०.०७ टक्के एवढे मतदान झाले.  

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा