शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Rahul Gandhi : "पुलवामा हल्ल्याला 5 वर्षे! कोणतीही सुनावणी नाही, आशा नाही"; राहुल गांधींनी सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 18:16 IST

Congress Rahul Gandhi : राहुल गांधी य़ांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी य़ांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पुलवामा हल्ल्याला 5 वर्षे! कोणतीही सुनावणी नाही, आशा नाही आणि असंख्य प्रश्न ज्यांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत" असं राहुल यांनी म्हटलं आहे. यासोबतच एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये शहीद कुटुंबियांच्या व्यथा मांडण्यात आल्या आहेत.

बुधवारी सकाळी राहुल गांधी यांनी पुलावामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. "पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शूर शहीदांना सलाम आणि विनम्र श्रद्धांजली. भारताच्या संरक्षणासाठी समर्पित केलेल्या त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल देश त्यांचा सदैव ऋणी राहील" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. 14 फेब्रुवारी ही तारीख भारताच्या इतिहासात एक दुःखद तारीख म्हणून नोंदवली जाते. या तारखेला 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला. 

केंद्रीय राखीव पोलीस दलाचा ताफा श्रीनगर जम्मू महामार्गावरून जात होता. संपूर्ण ताफ्यात 78 वाहने होती, ज्यामध्ये 2,547 जवान होते. ताफा पुलवामा येथे पोहोचताच जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी ताफ्याच्या वाहनासह 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या एसयूव्हीला धडक दिली. स्फोटात बसलेल्या दोन बसपैकी एका बसचे तुकडे झाले. 

पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. काश्मीरमध्ये 30 वर्षांतील हा सर्वात मोठा हल्ला होता. पुलवामा हल्ल्याच्या 13 दिवसांनंतर भारताने बदला घेतला. भारतीय हवाई दलाची मिराज विमानं पाकिस्तानात घुसली आणि जैशच्या सर्वात मोठ्या दहशतवादी तळावर बॉम्बस्फोट करून ते उद्ध्वस्त केलं. बालाकोटमध्ये बॉम्ब टाकले होते. यामध्ये 350 दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला