शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Farmers Protest: शेती आणि देशाच्या रक्षणासाठी शेतकरी मरतायत; ५०० जणांच्या मृत्यूवरून राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 17:31 IST

Farmers Protest: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत एक ट्विट करत टीका केली आहे.

नवी दिल्ली: केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टिकैत या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. या गेल्या सहा महिन्यांच्या काळात शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी ५०० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत एक ट्विट करत टीका केली आहे. (congress rahul gandhi tweet for farmers protest against farm laws) 

नव्या वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या असल्या तरीही यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र, तरीही शेतकरी मागे हटण्यास तयार नाही. या कालावधीत तब्बल ५०० शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासंदर्भात किसान एकता मोर्चाच्या वतीने ट्विट करण्यात आले असून, मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करत ट्विट केले आहे. 

बाबा रामदेव यांना धक्का! भूताननंतर नेपाळमध्ये कोरोनिलवर बंदी; नेमकं कारण काय?

शेती आणि देशाच्या रक्षणासाठी शेतकरी मरतायत

शेतकरी आपली शेती व देशाच्या रक्षणासाठी शेतकरी मरत आहेत. पण ते घाबरलेले नाहीत नाहीत आणि आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच यासोबत #500DeathsAtFarmersProtest हा हॅशटॅगही दिला आहे. जोपर्यंत विजय होत नाही तोवर आम्ही आंदोलन करणार असल्याचे किसान एकता मोर्चाने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, २६ नोव्हेंबर २०२० रोजी शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात आवाज उठवत आंदोनालास सुरुवात केली. कोरोनासह अन्य कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता आंदोलन सुरूच ठेवले. यात काही शेतकऱ्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे. दुसरीकडे हे आंदोलन नेमके कधीपर्यंत चालणार हेदेखील अस्पष्ट आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आंदोलन प्रभावित झाले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून, आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी राकेश टिकैत यांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. यापूर्वीच ममता बॅनर्जी यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसrakesh tikaitराकेश टिकैतPoliticsराजकारण