शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

लष्कराच्या ‘चलो दिल्ली’चा काँग्रेसकडून इन्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2016 3:16 AM

संपुआ सरकारच्या काळात २०१२मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांनी निवृत्तीच्या वयावरून सरकारशी संघर्ष पुकारला होता.

नवी दिल्ली : संपुआ सरकारच्या काळात २०१२मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांनी निवृत्तीच्या वयावरून सरकारशी संघर्ष पुकारला होता. त्यानंतर लष्कराच्या तुकड्यांनी दिल्लीकडे आगेकूच करीत बंडाच्या हालचाली चालविल्या होता, असा दावा माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी केला आहे. त्यावरून रविवारी दिल्लीतील राजकारण तापले. तिवारी यांनी हा मुद्दा उपस्थित करीत जणू त्या काळी सत्तेवर असलेल्या संपुआ सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पण काँग्रेसनेच हा दावा खोडून काढल्याने तिवारी एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले. तरीही जदयूने व्ही.के. सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर भाजपाने संपुआ सरकारचे नेतृत्व केलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवेदनाची मागणी केली. स्वत: व्ही.के. सिंग यांनी ‘बकवास’ या एका विशेषणाने तिवारींच्या आरोपाची संभावना केली. त्या वेळी सैन्याने आगेकूच केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते ते दुर्दैवी असले तरी सत्य होते, असे तिवारींनी म्हटले आहे. काँग्रेसने तिवारींच्या या दाव्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले; शिवाय तिवारींचा दावा खोटा असल्याचे सांगताना तत्कालीन लष्करप्रमुख विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी म्हटले, तिवारी यांच्याकडे सध्या कोणतेही काम नाही, त्यामुळे त्यांनी हे तद्दन ‘बकवास’ विधान केले आहे.तिवारींनी हे विधान करण्यासाठी हीच वेळ का निवडली, असा प्रश्न उपस्थित करीत भाजपाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवेदनाची मागणी केली आहे. तिवारी हे आॅक्टोबर २०१२ ते मे २०१४ या काळात माहिती आणि प्रसारण मंत्री राहिले होते.मी त्या वेळी संरक्षणासंबंधी स्थायी समितीचा सदस्य होतो. लष्कराने आगेकूच केल्याचे वृत्त दुर्दैवी मात्र सत्य होते. मला या वादात पडायचे नाही, मात्र ते वृत्त खरे होते, असे तिवारी यांनी शनिवारी एका पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी म्हटले. एका इंग्रजी दैनिकाने ४ एप्रिल २०१२ रोजी हे वृत्त प्रसिद्ध केले होते. सरकारला कोणतीही माहिती न देता लष्कराच्या दोन तुकड्यांनी दिल्लीकडे आगेकूच केल्याचे त्यात म्हटले होते. तिवारी यांनी या मुद्द्यावर पुस्तकात लिहिले असून, ते वाचले जावे अशी त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे, स्वत:चे पुस्तक सर्वांनी वाचावे, असे त्यांना सुचवायचे असावे, असे व्ही.के. सिंग यांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)वृत्तात काय म्हटले होते....१६ जानेवारी २०१२ रोजी हरियाणातील हिस्सार येथून लष्कराच्या इन्फन्ट्रीमधील एका तुकडीने सरकारला कोणतीही माहिती न देता अनपेक्षितपणे दिल्लीकडे कूच केले होते.त्याच रात्री आग्रा येथील ५०व्या निमलष्करी दलाच्या एका तुकडीनेही दिल्लीकडे प्रस्थान केले होते, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने दिले होते.