शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

संविधानाला काँग्रेसने वारंवार घायाळ केले; PM मोदी यांचा पलटवार, लोकसभेतील चर्चेला उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 05:35 IST

लोकसभेतील दोन दिवसीय चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, अनेक बाबतीत विविधता असलेल्या देशात फुटीचे विषारी बीज रोवण्याचा, तसेच ऐक्याला बाधा आणण्याकरिता काँग्रेसने कारवाया केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: काँग्रेसने दुरुस्त्या करून संविधानाला वारंवार घायाळ केले. रक्ताची चटक लागल्यानंतर वारंवार दुसऱ्यांना जखमी करावे, तसे काँग्रेसचे वर्तन आहे. २०१४ साली सत्तेत आल्यापासून आमच्या सरकारने भारताचे सामर्थ्य व ऐक्य वाढविण्यासाठी राज्यघटनेतील मूल्यांनुसार निर्णय घेतले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

लोकसभेतील दोन दिवसीय चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, अनेक बाबतीत विविधता असलेल्या देशात फुटीचे विषारी बीज रोवण्याचा, तसेच ऐक्याला बाधा आणण्याकरिता काँग्रेसने कारवाया केल्या. राज्यघटनेवर हल्ले चढविण्याची एकही संधी नेहरू-गांधी कुटुंबाने सोडलेली नाही. या कुटुंबाने राज्यघटनेला प्रत्येक स्तरावर आव्हान दिले आहे. देशात नेहरू- गांधी कुटुंबाने ५५ वर्षे राज्य केले. नेहरू-गांधी कुटुंबाच्या आताच्या वंशजांनीही राज्यघटनेशी खेळ चालविला आहे.

देशाचे तुरुंगात रूपांतर

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, काँग्रेस सरकारने देशाचे कारागृहात रूपांतर केले होते, तर न्यायायंत्रणेचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. राजीव गांधी यांनीही राज्यघटनेमध्ये दुरुस्त्या केल्या. काँग्रेसवर लागलेला कलंक कधीही पुसला जाणार नाही. यूपीएच्या काळात सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय सल्लागार समितीला कॅबिनेटपेक्षा अधिक महत्त्व देण्यात आले होते.

'काँग्रेसकडून राज्यघटनेचा भंग'

राज्यघटनेच्या निर्मात्यांनी धर्माच्या आधारे राखीव जागा देण्यास मनाई केली होती. देशाचे हित लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र, सत्तालालसा व व्होटबँकेच्या अनुनयासाठी काँग्रेसने राज्यघटनेतील तरतुदींचा भंग केला आहे. आमच्या सरकारने ३७० कलम रद्द केले.

'नेहरू यांनी विचार स्वातंत्र्यावर आणली बंधने...

'पंतप्रधान म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी विचार स्वातंत्र्यावर बंधने आणण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती केली होती. आपली खासदारकी रद्द करण्याचा निर्णय देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली. इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची गळचेपी, तसेच राज्यघटनेमध्ये बदल केले. आपली पंतप्रधानपदाची खुर्ची वाचविण्यासाठी त्यांनी हे सारे निर्णय घेतले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांना कायदेशीर आव्हानांपासून पूर्वलक्षी प्रभावाने संरक्षण मिळविण्यासाठी इंदिरा गांधी यांनी घटनादुरुस्ती केली होती. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपा