शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"सहा वर्षांपासूनचा 'अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड' आता 'अ‍ॅक्ट ऑफ गॉड' म्हणून लपवला जातोय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 15:40 IST

काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल; विविध विषयांवरून जोरदार टीका

नवी दिल्ली: देशाची ढासळती अर्थव्यवस्था, त्यामुळे निर्माण झालेलं बेरोजगारीचं संकट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. देशात दररोज ३८ बेरोजगार आणि ११६ शेतकरी आत्महत्या करत असताना पंतप्रधान मोदींना झोप तरी कशी लागू शकते?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. गेल्या ७३ वर्षांत पहिल्यांदाच अर्थव्यवस्था आणि देशातील जनता या दोघांचंही कंबरडं मोडण्यात आलंय. देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. देश आणीबाणीच्या स्थितीत चालला आहे. कोसळणारा जीडीपी सरकारच्या अपयशाचा सर्वात मोठा पुरावा आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊन 'मास्टरस्ट्रोक' नव्हे, तर 'डिझास्टर स्ट्रोक' ठरले आहेत, अशा शब्दांत सुरजेवालांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.मला संजय राऊतांनी धमकी दिली; कंगनाच्या आरोपांना राऊतांकडून जोरदार प्रत्युत्तरकाही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाचा उल्लेख ऍक्ट ऑफ गॉड असा केला होता. त्यावरूनही सुरजेवालांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. 'गेल्या सहा वर्षांपासून 'अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड'च्या माध्यमातून अर्थव्यवस्था हाकणारे आता त्यांचं अपयश 'अ‍ॅक्ट ऑफ गॉड'च्या नावावर खपवत आहेत. जीडीपीची घसरण सामान्यांच्या जीवावर उठली आहे. लोकांचा आणि बँकांचा सरकारवरील विश्वास उडाला आहे,' अशी टीका सुरजेवाला यांनी केली. कंगना राणौतचा रणबीर, रणवीर, विकीवर हल्लाबोल; म्हणाली, ड्रग्ज घेत नाही तर ब्लड टेस्ट करा...!देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मात्र मोदी सरकार देशासमोरील समस्यांपासून पळ काढतंय, असं सुरजेवाला म्हणाले. '८० लाख लोकांनी त्यांच्या पीएफ खात्यातून ३० हजार कोटी रुपये काढलते. अनेक लघु-मध्यम उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र पंतप्रधान कोरोना, चीनची घुसखोरी, अर्थव्यवस्था, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून बचावाच्या प्रयत्नात आहेत. पण आम्ही संसदेत आणि संसदेच्या बाहेरही आपलं म्हणणं मांडतच राहू, असंही सुरजेवाला पुढे म्हणाले.बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती; कंगना राणौतचे राम कदमांना उत्तर

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीfarmer suicideशेतकरी आत्महत्याEconomyअर्थव्यवस्था