शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राष्ट्रीय अधिवेशनासाठी काँग्रेसची जोरदार तयारी, राहुल यांच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:48 IST

अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर पक्षाचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन राजधानीत होत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्यासाठी हे तीन दिवसांचे अधिवेशन महत्त्वाचे ठरेल.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर पक्षाचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन राजधानीत होत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्यासाठी हे तीन दिवसांचे अधिवेशन महत्त्वाचे ठरेल. अधिवेशनात राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले जाईल. ते व्यवस्थितपणे होण्यासाठी राहुल यांनी अनेक समित्यांचे स्थापन केल्या आहेत.अधिवेशनातील प्रमुख समारंभासाठी ३१ सदस्यांची समिती बनवण्यात आली आहे. मोतीलाल व्होरा या समितीचे अध्यक्ष असून, संचालनाची जबाबदारी आॅस्कर फर्नांडिस यांच्यावर असेल. गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, अंबिका सोनी, दिग्विजय सिंह, कमलनाथ, जर्नादन द्विवेदी, सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, मोहन प्रकाश यांच्यासह सर्व सरचिटणीस व राज्यांचे प्रभारी नेते समितीत असतील. विशेष निमंत्रित म्हणून अहमद पटेल, शीला दीक्षित, अजय माकन, शर्मिष्ठा मुखर्जी, अमित चावडा, कुलदीप बिष्णोई आदी नेत्यांना स्थान दिले आहे.अधिवेशनात मांडण्याच्या प्रस्तावांसाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ४४ सदस्यांची समिती आहे. मुकुल वासनिक तिचे संयोजक असतील. ए. के. एन्थनी हे राजकीय ठरावांच्या समितीचे प्रमुख असून, कुमारी शैलजा संयोजक आहेत. आर्थिक विषयांवरील प्रस्ताव तयार करण्यासाठी पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, जयराम रमेश या समितीचे संयोजक असतील. परराष्टविषयक ठरावांसाठीच्या समितीचे अध्यक्षपद आनंद शर्मा यांच्याकडे असून, संयोजन ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे असेल.घटनादुरुस्ती समिती-या अधिवेशनात काँग्रेसच्या घटनेतही बदल केले जाणार आहेत, त्यांचे स्वरूप ठरवण्यासाठीच्या समितीचे प्रमुख गुलाम नबी आझाद आहेत. त्यांना जनार्दन द्विवेदी सहकार्य करतील. या समितीने मांडलेल्या घटनादुरुस्तीवर अधिवेशनात शिक्कामोर्तब होईल.ज्वलंत विषयांवर ठराव : शेतकºयांचे प्रश्न, बेरोजगारी, दुर्बल घटकांच्या समस्या आदी मुद्द्यांवर ठराव तयार करण्याचे काम भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या समितीकेडे दिले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस