शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

न्यायालयीन लढाई काँग्रेसने जिंकली...

By admin | Published: July 14, 2016 3:10 AM

अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास प्रवृत्त करणारा राज्यपाल जेपी राजखोवांचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवल्यामुळे मोदी सरकारला झटका बसला, तर काँग्रेसमध्ये आनंदाचे उधाण आले

सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास प्रवृत्त करणारा राज्यपाल जेपी राजखोवांचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवल्यामुळे मोदी सरकारला झटका बसला, तर काँग्रेसमध्ये आनंदाचे उधाण आले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही निकालाचे निमित्त साधून मोदी सरकारवर जोरदार प्रहार केले आहेत. अरुणाचलात डिसेंबर, जानेवारी महिन्यात घडलेल्या घटनाक्रमाकडे दृष्टिक्षेप टाकला, तर काँग्रेसच्या ४२ पैकी २१ आमदारांनी पक्षाच्या नेतृत्वाविरुध्द बंडखोरी केल्यामुळे ही स्थिती उद्भवली होती. बंडखोरांना हाताशी धरून राज्यात सत्ताबदल घडवण्यात भाजपाला त्यामुळे यश मिळाले. बुधवारी काँग्रेसने न्यायालयीन लढाई जिंकली. मात्र, बंडखोर आमदारांचे मन वळवून त्यांना पुन्हा स्वगृही आणण्याचे आव्हान अद्याप शिल्लक आहे. ६0 सदस्यांच्या विधानसभेत ४२ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला, अरुणाचलात आव्हान नव्हते. तथापि, मुख्यमंत्री नबाम तुकी राज्यात हुकुमशाही पद्धतीने कारभार करीत आहेत, अशी तक्रार करीत काँग्रेस आमदार कालिको पुल यांनी बंडखोरीचे निशाण फडकवले. बंडखोरीत सुरुवातीला त्यांना फक्त २१ आमदारांचा पाठिंबा मिळाला. मात्र, भाजपाच्या पाठिंब्यावर पुल यांचे सरकार सत्तेवर येताच आणखी ९ आमदारांचे समर्थन त्यांना प्राप्त झाले.न्यायालयीन निकालाने आता चित्र बदलले आहे. निकालावर समजा केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली, तर अरुणाचलातील सत्ता हाती घेण्यास काँग्रेसला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. भाजपा प्रवक्ते सिद्धार्थनाथसिंग यांनी तशी शक्यता बोलूनही दाखवली. बुधवारच्या निकालानंतर बंडखोरांचे मन वळवण्याबाबत मात्र काँग्रेस बऱ्यापैकी आश्वस्त असल्याचे जाणवते आहे. संसदेच्या मान्सून अधिवेशनातही अरुणाचलच्या लढाईचे पडसाद उमटणार आहेत. काँग्रेस खासदार कपिल सिब्बल त्या आॅडिओ टेपची चौकशी करण्याची मागणी करीत आहेत, ज्यात पंतप्रधान मोदी आणि राजनाथसिंगांचा थेट उल्लेख आहे.