शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
2
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
3
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
4
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
5
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
6
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
7
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
8
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
9
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
10
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
11
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
12
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
13
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
14
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
15
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
16
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
17
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
18
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
19
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
20
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?

काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधून सुरुवात, राहुल गांधी ६७ दिवसांत देश पिंजून काढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 5:56 PM

Bharat Jodo Nyaya Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला आज मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मणिपूरमधील थौबल जिल्ह्यातून हिवरा झेंडा दाखवून या यात्रेला औपचारिक सुरुवात केली आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला आज मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मणिपूरमधील थौबल जिल्ह्यातून हिवरा झेंडा दाखवून या यात्रेला औपचारिक सुरुवात केली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सलमान खुर्शिद, राजीव शुक्ला, आनंद शर्मा, रणदीप सिंह सुरजेवाला, अशोक गहलोत, अभिषेक मनू सिंघवी, भूपेंद्र सिंह हुड्डा, सचिन पायलट, दिग्विजय सिंह, प्रमोद तिवारी यांच्यासह काँग्रेसचे सुमारे ७० हून अधिक नेते इंफाळ येथे दाखल झाले आहेत.

भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून ६ हजार ७१३ किलोमीटर अंतर पार करून २० मार्च रोजी मुंबईमध्ये समाप्त होणार आहे. यादरम्यान, राहुल गांधी हे ६०-७० काँग्रेस नेत्यांसह बसच्या माध्यमातून हे अंतर पार करणार आहेत. तसेच ही यात्रा काही प्रमुख ठिकामी पायी प्रवास करणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत प्रवार केला आहे. ३५०० किमी चाललेली ही भारत जोडो यात्रा १२ राज्यांमधून गेली होती. तर भारत जोडो न्याय यात्रा १५ राज्यांमधून प्रवास करणार आहेत. 

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या यशावर सकारात्मक परिणाम होईल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही ६७ दिवसांमध्ये ११० जिल्ह्यामधून जाणार आहे. या यात्रेत राहुल गांधी हे तब्बल ३५५ लोकसभा मतदारसंघांना कव्हर करणार आहेत. हा आकडा देशातील एकूण लोकसभा मतदारसंघांपैकी ६५ टक्के एवढा आहे. २०१९ मध्ये भाजपाने या ३५५ मतदारसंघांपैकी २३६ मतदारसंघात विजय मिळवला होता. तर काँग्रेसला केवळ १४ जागा मिळाल्या होत्या. ही यात्रा मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यांतूनही जाणार आहे. या राज्यांत काँग्रेसचा नुकताच पराभव झाला होता.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या यात्रेबाबत सांगितले की, ही यात्रा गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक अन्यायाला विचारात घेऊन काढण्यात येत आहे. काँग्रेस पक्ष सुरुवातीला ही यात्रा मणिपूरची राजधानी असलेल्या इंफाळ येथून सुरू होणार होती. मात्र राज्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे नंतर येथून २५ किमी अंतरावर असलेल्या थौबल जिल्ह्यातून या यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस