शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

मोदींना बदनाम करण्याचा होता कट

By admin | Published: March 11, 2016 3:15 AM

इशरत जहाँप्रकरणी प्रतिज्ञापत्र बदलण्यामागे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा यापूर्वीच्या संपुआ सरकारचा कट होता

नवी दिल्ली : इशरत जहाँप्रकरणी प्रतिज्ञापत्र बदलण्यामागे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा यापूर्वीच्या संपुआ सरकारचा कट होता, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत गुरुवारी केला आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल,असेही स्पष्ट केले.इशरत ही लष्कर-ए-तोयबा या संघटनेची दहशतवादी होती, असे प्रथम सांगण्यात आले होते. नंतर सरकारने दुसरे प्रतिज्ञापत्र सादर करून आपली भूमिका बदलली. ही दोन्ही प्रतिज्ञापत्रे कुठल्या परिस्थितीत सादर करण्यात आली याची गृहमंत्रालय चौकशी करीत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. या प्रकरणातील काही दस्तावेज गहाळ झाले आहेत. परंतु मंत्रालय स्तरावर अंतर्गत शोध मोहीम सुरू असून यासंदर्भात पुरावे गोळा करण्यात येत आहेत असेही ते म्हणाले. लोकसभेत काही सदस्यांनी लक्षवेधीद्वारे इशरत जहाँप्रकरणी प्रतिज्ञापत्रात कथित बदलासंदर्भात लक्षवेधी दाखल केली होती. त्यावरील चर्चेला गृहमंत्र्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, इशरत ही लष्कर-ए-तोयबाची दहशतवादी होती हे लपवून ठेवण्याचा प्रयत्न तत्कालीन संपुआ सरकारने केला. आपल्या पहिल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने हे स्वीकारले होते. पण महिनाभरानंतर प्रतिज्ञापत्र बदलण्यात आले. मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याच्या साक्षीमुळेही इशरतचे लष्करशी संबंध होते हे सिद्ध झाले आहे. दहशतवादाच्या मुद्यावर राजकारण होऊ नये असे आवाहन करतानाच या समस्येकडे कदापि दुर्लक्ष केले जाणार नाही, अशी ग्वाही राजनाथसिंग यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)