शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

अनोखा आदर्श! फक्त 1 रुपया आणि नारळ घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 14:35 IST

नवरदेवाने हुंडा प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे

देशात हुंड्याच्या नावाखाली छळ, मारहाणीच्या घटना समोर येत आहेत. तर काही लोक हुंडा न घेता देखील लग्न करत आहेत. अशीच एक घटना कोटा जिल्ह्यातील सुलतानपूर भागातील दरबिजी गावात समोर आली आहे. ज्यामध्ये नवरदेवाने हुंडा प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सुलतानपूर नगर पोलीस स्टेशनचे हवालदार मुकेश मीणा यांनी त्यांच्या लग्नात हा संदेश दिला आहे.

नवरदेवाने फक्त एक रुपया आणि एक नारळ घेऊन नवरीशी लग्नगाठ बांधली. लग्नात हुंडा घेणार नाही, असं त्यांनी आधीच ठरवलं होतं असं मुकेश यांनी म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दरबिजी गावातील रहिवासी रामावतार मीणा यांची मुलगी सुमन हिचा विवाह बुंदी जिल्ह्यातील जेतपूर येथील रहिवासी साबुलाल मीणा यांचा मुलगा मुकेश यांच्याशी होणार होता, मुकेश हे सुलतानपूर पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहेत.

लग्नात वधूच्या वडिलांनी एक लाख रुपये आणि इतर वस्तू हुंडा म्हणून दिल्या होत्या, पण मुकेश आणि त्यांचे वडील साबुलाल यांनी त्या मोठ्या सन्मानाने परत केल्या. सुरुवातीला वधूच्या वडिलांना वाटले की आपली चूक झाली असावी. त्यामुळे हुंड्याच्या वस्तू परत करण्यात आल्या आहेत. मुकेश य़ांनी एक रुपया आणि नारळ घेऊन लग्नाबाबत सासरच्या मंडळींना सांगितले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लग्नाला आलेले नातेवाईक, पाहुणे सगळेच या उपक्रमाचे कौतुक करत आहेत. हुंडामुक्त लग्न करून समाजाला संदेश द्यायचा होता, असं मुकेश यांनी सांगितलं. या निर्णयात त्यांच्या आई-वडिलांनी त्याला साथ दिली. 

सुमनला एक रुपया आणि 1 नारळ देऊन जीवनसाथी बनवलं. हुंड्यामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त होत असून मुलींच्या हत्या होत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या मुलीला क्षमतेपेक्षा जास्त हुंडा देऊन वडील कर्जबाजारी होत आहेत. काही वेळा मुलीच्या लग्नासाठी वडिलांना जमीनही विकावी लागते. अशा परिस्थितीत लोकांनी जागरुक राहायला हवे. पोलीस ठाण्यातील अनेक तरुण अधिकारी या लग्नासाठी उपस्थित होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नdowryहुंडा