शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
2
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
3
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
4
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
5
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
6
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
7
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
8
Rishabh Pant vs Liton Das:"भावा मला का मारतोस.." अन् लिटन दासवर भडकला पंत (VIDEO)
9
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
10
Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा?
11
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
12
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
13
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...
14
रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाजपा नेता; पोलिसाने लुटली सोन्याची चेन, ४ अंगठ्या, २ मोबाईल
15
पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ८ राशींना संमिश्र, अखंड सावध राहावे; सूर्य-शनीची वक्र दृष्टी!
16
रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू
17
Bajaj Housing Finance Ltd: लिस्टिंगच्या ३ दिवसांत १७०% चा नफा; आता 'हा' शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१५६ वर आला भाव
18
Sanjay Roy : "२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
19
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेनंतर सरकार १००० कोटींचे 'हे' काम करणार!
20
Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक

औषधांच्या किमती नियंत्रणात आणा

By admin | Published: March 17, 2016 3:34 AM

जास्तीत जास्त औषधे जीवनरक्षक श्रेणीत समाविष्ट करून त्यांच्या किमती नियंत्रणात आणण्यात याव्यात, अशी मागणी खासदार विजय दर्डा यांनी बुधवारी सरकारकडे केली.

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीजास्तीत जास्त औषधे जीवनरक्षक श्रेणीत समाविष्ट करून त्यांच्या किमती नियंत्रणात आणण्यात याव्यात, अशी मागणी खासदार विजय दर्डा यांनी बुधवारी सरकारकडे केली. राज्यसभेत लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना औषध निर्माते सरकारच्या मूल्य निर्धारण धोरणाचे पालन करीत नाहीत. परिणामी बाजाराचा ८० टक्के हिस्सा मूल्यनिर्धारण चौकटीच्या बाहेर आहे. या औषधांचा आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत समावेश नाही, असा थेट आरोप दर्डा यांनी केला. औषधांच्या आकाशाला भिडणाऱ्या किमतींवर गंभीर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, देशात गरिबांना औषधोपचार करणे जवळपास अशक्य झाले आहे. आजाराने त्रस्त एखाद्या गरीब व्यक्तीला औषधांसाठी एवढी मोठी किंमत अदा करणे किती कष्टदायी आहे याच्या केवळ विचारानेच हृदयाचा थरकाप उडतो. विजय दर्डा यांनी यासंदर्भातील वस्तुस्थिती सादर करताना सांगितले की, ४७०० औषधांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असल्याचे भारतीय औषध मूल्य नियंत्रकाच्या निदर्शनास आले आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा औषध मूल्य निर्धारण धोरण अव्यावहारिक आणि विसंगत असल्याचे म्हटले आहे. अनेक औषधांच्या किरकोळ मूल्यात ४,००० टक्क्यांपर्यंत तफावत असल्याचे गेल्या वर्षी एका प्रकरणात न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. असे आहे वास्तवपूर्वी २० अमेरिकन डॉलर्सला मिळणाऱ्या एचआयव्हीच्या औषधाची किंमत आता ७५० डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. त्याचप्रमाणे मधुमेह, हेपेटायटिससारख्या औषधांच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. देशात औषधांच्या मूल्य निर्धारणासाठी एक धोरण तयार करण्यात आले असून एनएलईएमअंतर्गत ३४८ औषधांना आवश्यक औषधांच्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे, हे सर्वश्रुत आहे. तरीही या व्यवस्थेचे पालन होत नसल्याचे दिसून येते.एवढेच नाहीतर प्राधिकरणही या यादीत समाविष्ट औषधांची कुठल्या किमतीने विक्री होत आहे याची आकडेवारी योग्य पद्धतीने गोळा करीत नसून ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकाराने गरीब जनता मात्र होरपळली जात असून आजारावर योग्य उपचार करण्यास घाबरत आहे, अशी खंत दर्डा यांनी व्यक्त केली.