शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

सम-विषम योजनेमुळे दिल्लीतील प्रदूषणावर नियंत्रण

By admin | Published: January 02, 2016 10:57 AM

वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने लागू केलेल्या सम-विषम योजनेमुळे इतर दिवसांच्या तुलनेत दिल्लीत शुक्रवारी १० टक्के कमी प्रदूषण झाल्याची माहिती समोर येत आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लागू केलेल्या महत्त्वाकांक्षी सम-विषम योजनेमुळे इतर दिवसांच्या तुलनेत राजधानीत शुक्रवारी १० टक्के कमी प्रदूषण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सम-विषम योजना यशस्वी ठरताना दिसत आहे. 
सम-विषम तारखेला चारचाकी वाहने त्यांच्या सम-विषम क्रमांकानुसार रस्त्यावर उतरवण्याची नवी योजना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणली असून या योजनेला पहिल्याच दिवशी १ जानेवारी ( शुक्रवार) चांगला प्रतिसाद मिळाला आणि कारच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली. परिणामी पहिल्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी २ दरम्यान १० टक्के प्रदूषण कमी आढळले. तसेच स्त्यांवर वाहनाची गर्दी नसल्यामुळे प्रवासी खूष दिसून आले. मात्र ही योजना नेमकी किती परिणामदायी आहे, हे दोन-तीन दिवसांनीच स्पष्ट होऊ शकेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले. 
दिल्लीच्या मंत्र्यांनी मोटरबाईक, ई-रिक्षा, बस व भाड्याच्या कारसारख्या विविध वाहनांचा वापर करीत नववर्षाच्या पहिल्या दिवशी सचिवालय गाठले. पर्यटन मंत्री कपिल मिश्रा हे सकाळी ९ च्या सुमारास बाईकने सचिवालयात आले.