शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

कोरोना नक्कीच बरा होतो, 101 वर्षीय आजीबाईला रुग्णालयातून डिस्चार्ज  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 12:49 IST

मंगम्मा असे या 101 वर्षीय आजीबाईचे नाव असून 25 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला. कोरोना रुग्णावर त्यांनी मात केली असून त्या आता कोरोनामुक्त असल्याचे डॉ. राम यांनी सांगितले.

ठळक मुद्देमंगम्मा असे या 101 वर्षीय आजीबाईचे नाव असून 25 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला.

बंगळुरू - देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लॉकडाऊन असतानाही रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तर, वैद्यकीय व्यवस्थापनामुळे मृत्युदरातही मोठी घट होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. तिरुपती येथे एका 101 वर्षीय आजीने कोरोनावर मात केली आहे. येथील श्री पद्मावती महिला रुग्णालयातून नुकताच त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. 

मंगम्मा असे या 101 वर्षीय आजीबाईचे नाव असून 25 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला. कोरोना रुग्णावर त्यांनी मात केली असून त्या आता कोरोनामुक्त असल्याचे डॉ. राम यांनी सांगितले. मंगम्मा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर तिरुपती येथील श्री व्यंकटेश इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या श्री पद्मावती महिला रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांनी विशेष काळजी घेतली. त्यामुळे, काही दिवसांतच आजीबाईने कोरोनावर मात केली. कोरोनामुळे मृत्यू होतो, अशी भीती मनात बाळगणाऱ्यांसाठी मंगम्मा एक उदाहरण ठरल्या आहेत. कोरोना बरा होतो, त्याला घाबरायचं नाही, असा संदेशच मंगम्मा यांनी दिल्याचे डॉक्टरांनी म्हटले.

दरम्यान, दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यात एका 100 वर्षीय आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर मी रुग्णलयात दाखल होते. तेथे डॉक्टरांनी माझी चांगली देखभाल घेतली, तसेच मला दररोज सफरचंद, औषधं आणि इंजेक्शनही देण्यात आले. त्यामुळे, आता माझी तब्येत ठणठणीत असल्याचं या आजींनी म्हटलं. तसेच,  कोरोना हा किरकोळ सर्दीचा आजार असल्याचंही हल्लाम्मा यांनी म्हटलंय.

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच, राज्यात दिवसभरात ९ हजार २५१ नवीन बाधितांची नोंद झाली, तर २५७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख ६६ हजार ३६८ इतकी झाली आहे. तर बळींचा आकडा १३ हजार ३८९ झाला आहे. राज्यात शनिवारी ७ हजार २२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत २ लाख ७ हजार १९४ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ टक्के झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtirupati-pcतिरुपतीTamilnaduतामिळनाडू