शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Corona in India: कोरोना काळात गंगेत किती मृतदेह आढळले? केंद्र सरकारने संसदेत दिले 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:00 IST

'जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये मृतदेह गंगेत वाहत असल्याचे चित्र प्रसिद्ध झाले होते. सरकारने संसदेत आकडेवारी सांगावी.'

नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या काळात गंगा नदीत फेकलेल्या मृतदेहांवरुन वाद पुन्हा चिघळला आहे. सोमवारी तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी विचारले की, कोरोना काळात गंगा नदीत किती मृतदेह फेकण्यात आले? त्यावर जलशक्ती राज्यमंत्री विश्वेश्वर तुडू यांनी लेखी उत्तर दिले. कोविड-19 संबंधित मृतदेह गंगा नदीत फेकल्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये अज्ञात मृतदेह गंगेत वाहून गेल्याच्या घटना प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. जलशक्ती मंत्रालयाने संबंधित राज्य सरकारांकडून गंगेत वाहणाऱ्या मृतदेहांचा अहवाल मागवला होता.

जलशक्ती राज्यमंत्र्यांच्या या लेखी उत्तरावरुन वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसने जलशक्ती राज्यमंत्र्यांवर खोटी तथ्ये संसदेत मांडल्याचा आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार शुभेंदू शेखर राय यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, सरकार खोटे बोलत आहे. सरकार वस्तुस्थिती लपवत आहे. जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये मृतदेह गंगेत वाहत असल्याचे चित्र प्रसिद्ध झाले होते. गंगेत किती मृतदेह फेकले, हे सरकारने संसदेत सांगावे. हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संसदेचा अपमान आहे.

दुसरीकडे, सरकारकडे यापेक्षा असंवेदनशील आणि असभ्य उत्तर असू शकत नाही, असं आरजेडी खासदार मनोज झा म्हणाले. काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, सरकार संसदेत वारंवार आकडे लपवत आहे. गेल्या सत्रात केसी वेणुगोपाल यांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत प्रश्न विचारला होता, ज्याच्या उत्तरात आरोग्य राज्यमंत्र्यांनी सरकारकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले होते. या प्रकरणी केसी वेणुगोपाल यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना विशेषाधिकार भंगाची नोटीसही दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकारtmcठाणे महापालिका