शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

Corona in India: कोरोना काळात गंगेत किती मृतदेह आढळले? केंद्र सरकारने संसदेत दिले 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 5:59 PM

'जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये मृतदेह गंगेत वाहत असल्याचे चित्र प्रसिद्ध झाले होते. सरकारने संसदेत आकडेवारी सांगावी.'

नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या काळात गंगा नदीत फेकलेल्या मृतदेहांवरुन वाद पुन्हा चिघळला आहे. सोमवारी तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी विचारले की, कोरोना काळात गंगा नदीत किती मृतदेह फेकण्यात आले? त्यावर जलशक्ती राज्यमंत्री विश्वेश्वर तुडू यांनी लेखी उत्तर दिले. कोविड-19 संबंधित मृतदेह गंगा नदीत फेकल्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये अज्ञात मृतदेह गंगेत वाहून गेल्याच्या घटना प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. जलशक्ती मंत्रालयाने संबंधित राज्य सरकारांकडून गंगेत वाहणाऱ्या मृतदेहांचा अहवाल मागवला होता.

जलशक्ती राज्यमंत्र्यांच्या या लेखी उत्तरावरुन वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसने जलशक्ती राज्यमंत्र्यांवर खोटी तथ्ये संसदेत मांडल्याचा आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार शुभेंदू शेखर राय यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, सरकार खोटे बोलत आहे. सरकार वस्तुस्थिती लपवत आहे. जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये मृतदेह गंगेत वाहत असल्याचे चित्र प्रसिद्ध झाले होते. गंगेत किती मृतदेह फेकले, हे सरकारने संसदेत सांगावे. हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संसदेचा अपमान आहे.

दुसरीकडे, सरकारकडे यापेक्षा असंवेदनशील आणि असभ्य उत्तर असू शकत नाही, असं आरजेडी खासदार मनोज झा म्हणाले. काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, सरकार संसदेत वारंवार आकडे लपवत आहे. गेल्या सत्रात केसी वेणुगोपाल यांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत प्रश्न विचारला होता, ज्याच्या उत्तरात आरोग्य राज्यमंत्र्यांनी सरकारकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले होते. या प्रकरणी केसी वेणुगोपाल यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना विशेषाधिकार भंगाची नोटीसही दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकारtmcठाणे महापालिका