शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

कोरोनाने आठ जणांचा मृत्यू, तरीही कुटुंबाची जिद्द कायम; हुंदका, आसवे अन् काळजी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 06:44 IST

२ बहिणी, ४ भाऊ, आई व काकूचा झाला होता वर्षापूर्वी मृत्यू 

लखनौ : लखनौमध्ये एका यादव कुटुंबीयाचे तब्बल ८ खोल्यांचे एकेकाळी माणसांनी गजबजलेले घर मागील एक वर्षापासून ओस पडले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या घरातील आठ लोकांचा २४ दिवसांत मृत्यू झाला. प्रत्येक मृत्यू व अंत्यसंस्कार सरासरी तीन दिवसांत होता. मृतांमध्ये २ बहिणी, त्यांचे ४ भाऊ, त्यांची आई व काकूचा समावेश होता. त्यातील काहीजण ऑक्सिजनसाठी खासगी रुग्णालयात तर काही घरी तडफडत होते. 

सीमा सिंह यांचे ४५ वर्षीय पती निरंकार सिंह शेतकरी होते. मागील वर्षी २५ एप्रिल रोजी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. ते ओरडत होते, ऑक्सिजनसाठी तडफडत होते. त्यांनी मला डॉक्टरकडे जाण्यास व आणखी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यास सांगितले होते. मी ऑक्सिजनचा प्रवाह वाढविण्यासाठी अक्षरश: भीक मागत होते. तरीही काही होऊ शकले नाही. अखेर तडफडून त्यांचा मृत्यू झाला, असे डोळ्यांतील न थांबणारे अश्रू पुसत सीमा यादव यांनी सांगितले.

घरातील एवढ्या लोकांच्या मृत्यूनंतर एक वर्ष जगणे म्हणजे खरे तर माझाच दररोज मृत्यू झाल्यासारखे होते. एवढ्या धक्क्यानंतर १९ व २१ वर्षांच्या मुलांचे शिक्षण करणे, याची मला आणखी चिंता होती. मोठा मुलगा हैदराबादेत फॅशन डिझायनरचा तर दुसरा मुलगा बारावीचे शिक्षण घेत आहे. तो शेतातही मदत करतो. एकेक दिवस काढणे खूप अवघड आहे. मी केवळ मुलांमुळे जिवंत आहे. त्यांना मला खूप शिकवायचे आहे, अशी जिद्द त्या बाळगून आहेत.

हुंदका, आसवे अन् काळजी...भरल्या घरातून ८ सदस्य गेल्यानंतर मागील वर्ष कसे काढले, असे विचारता कुसमा देवी यांना हुंदका दाटून येतो. डोळ्यांतील आसवे पुसत पुसत त्या म्हणतात, ‘आमच्यावर जे संकट आले, ते जगात दुसऱ्या कुणावरही येऊ नये. कुणाचे गरीब होणे ठीक आहे; परंतु अशा प्रकारचे दु:ख कोणालाही मिळू नये. आता घर कसे चालवावे, मुलांचे शिक्षण कसे करावे, ही चिंता आहे.’

भविष्याची चिंता... कुसमा देवीचे ६१ वर्षीय पती विजयकुमार सिंह हेही शेतकरी व सर्वांत मोठे भाऊ होते.मागील वर्षी १ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. त्या आता घरातील सर्वांत मोठ्या आहेत व सर्व कारभार त्याच पाहतात. सरकारने मदत दिली असली तरी भविष्याची चिंता त्यांना सतावते आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या