शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Corona vaccination : पुढील महिन्यापासून भारत पुन्हा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसी पुरवणार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 19:48 IST

Corona vaccination: कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारताने जगातील काही देशांना लसींचा पुरवठा केला होता. मात्र देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर बाहेरील देशांना होणारा लसींचा पुरवठा थांबवण्यात आला होता.

नवी दिल्ली - कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारताने जगातील काही देशांना लसींचा पुरवठा केला होता. मात्र देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर बाहेरील देशांना होणारा लसींचा पुरवठा थांबवण्यात आला होता. दरम्यान, आता पुढील महिन्यापासून भारत पुन्हा एकदा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसींचा पुरवठा करणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही घोषणा केली आहे. (India to supply corona vaccine to worldwide from next month: Health Minister)

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबतची घोषणा करताना आज सांगितले की, देशामध्ये कोरोना विषाणूविरोधातील सुरू असलेल्या लसीकरणाच्या अभियानांतर्गत आतापर्यंत ८१ कोटींहून अधिक व्यक्तींना लसीचे डोस देण्यात आले आहे. त्यांनी सांगितले दरम्यान, १० कोटी डोस तर केवळ ११ दिवसांत दिले गेले, अशी माहितीही त्यांनी दिली.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी पुढे सांगितले की, व्हॅक्सिन मैत्रींतर्गत भारत संपूर्ण जगाला मदत करणार आहे. तसेच चौथ्या तिमाहीमध्ये कोव्हॅक्समध्ये योगदान देणार आहे. आम्हाला पुढच्या महिन्यात कोरोनाविरोधी लसींचे ३० कोटींहून अधिक डोस मिळण्याची अपेक्षा आहे. लसींचे उत्पादन वाढणार आहे. याचं कारण म्हणजे जैविक ई आणि इतर कंपन्या आपल्या लसी बाजारात आणणार आहेत. कोव्हॅक्स एक जागतिक पाऊल आहे, त्याला औपचारिकपणे कोविड-१९ लसीची जागतिक पुरवठा सुविधा म्हणून ओळखले जाते. मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांना कोरोनावरील लसीचे डोस वेळेत मिळावे, हे सुनिश्चित करणे हे याचे लक्ष्य आहे.

यादरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने सांगितले की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-१९ लसींचे आतापर्यंत ७९.५८ कोटींहून अधिक डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. मंत्रालयाने सांगितले की, १५ अजून डोसचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांजवळ वापर करण्यासाठी लसीचे ५.४३ कोटी डोस उरलेले आहे.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींची उपलब्धता वाढवून लसीकरण अभियानाला गती देण्यात आली आहे. जेणेकरून त्याद्वारे चांगली योजना बनवता येईल. तसेच लसींच्या पुरवठ्याची साखळ सुव्यवस्थित करता येईल. राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानांतर्गत केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-१९ विरोधी लसी निशुल्कपणे उपलब्ध करून दिले जातील. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय