शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

"कोरोना नैसर्गिक नव्हता, तो जैविक युद्धाचा कट होता", श्री श्री रविशंकर यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 6:56 PM

कोरोना व्हायरस नैसर्गिक नसून ही महामारी काही देशांचे षड्यंत्र आहे. ते एक जैविक युद्ध होते, असे श्री श्री रविशंकर म्हणाले.

नवी दिल्ली : अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी कोरोना व्हायरसबाबत मोठे विधान केले आहे. कोरोना व्हायरस नैसर्गिक नसून ही महामारी काही देशांचे षड्यंत्र आहे. ते एक जैविक युद्ध होते, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. सोमवारी येथे महाराष्ट्रातील एका धार्मिक कार्यक्रमाला संबोधित करताना रविशंकर म्हणाले की, हे बरोबर सिद्ध झाले आहे, कारण मोठे देश आता म्हणत आहेत की कोरोनाव्हायरसविरूद्ध लस फारशी उपयुक्त ठरत नाहीत.

संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसशी लढा द्यावा लागला. लोकांना दोन वर्षे घरातच राहावे लागले. कोरोनाच्या प्रभावावर मी त्यावेळी म्हणालो होतो की, हा आजार नैसर्गिक नाही. हे काही देश आणि लोकांचे षड्यंत्र आहे, हे जैविक युद्ध आहे, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. तसेच, माझ्या शिष्यांनी देखील मला असे न बोलण्याचा सल्ला दिला होता, कारण यामुळे वाद निर्माण होईल. पण, मी जे म्हणत होतो ते आता सिद्ध झाले आहे, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले. 

याचबरोबर, जे मोठे देश कोरोना व्हायरसची लस बनवत आहेत, ते म्हणत आहेत की ही लस पाहिजे तितकी प्रभावी नाही. त्यामुळे संसर्गाचा प्रसार थांबत नाही. देशाची योग आणि आयुर्वेदावर श्रद्धा असायला हवी, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. तसेच, हर्बल आणि आयुर्वेदिक औषधे वापरली जावीत, असे मला वाटले आणि त्यासाठी एनएओक्यू 19 तयार केली आणि 14 हॉस्पिटलमध्ये त्याची चाचणी करण्यात आली, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.

याशिवाय, एनएओक्यू 19 कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी औषध म्हणून काम करत आहे. हे परदेशातील अनेक मोठ्या विद्यापीठांमध्ये पाठवण्यात आले आणि लोकांना समजले की, हे औषध कोरोना व्हायरसला रोखण्यात यशस्वी ठरेल. आपल्या देशाच्या योग आणि आयुर्वेदावर आपली श्रद्धा असली पाहिजे, असेही श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या