शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

 coronavaris : १ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 09:17 IST

coronavaris : १ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच 

मुंबई - कोरोना लॉकडाऊनच्या काळात समाजसेवक अन् मदतीनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येतंय. विशेष म्हणजे सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन स्वयंस्फूर्तीने हे समाजसेवक आपल्या दानशूर व्यक्तीत्वाचा बडेजावपणा सांगताना दिसत आहेत. एखाद्या गरिबाला थोडसं अन्न द्यायचं अन् १० जणांनी एकत्र येऊन फोटो काढायचा, जणू आता या गरिबाचा सगळा खर्च तेच करणार आहेत. विजेंदरने अशा समाजसेवा करणाऱ्यांना चांगलीच चपराक लगावली आहे. एका शायरीच्या माध्यमातून विजेंदरने अशा स्वयंस्फूर्ती समाजसेवकांवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर किराणा दुकाना आणि अत्यावश्यक सेवेच्या मालासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. मात्र, गरिब आणि मजदूर वर्गाची मोठी उपासमार या काळात होताना दिसून आली. या परिस्थितीत अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेत गरिबांना मदतीचा हात दिला. मात्र, या परिस्थितीत तोडकीशी मदत करत, फोटोसेशन आणि भंकपणाही होताना दिसून येत आहे. सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात हा दिखाऊपणा दिसून येतो. अनेकांनी केवळ पब्लिसिटी स्टंटसाठीच या मदतीचा उपयोग केला की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. नेहमीच आपले मत स्पष्टपणे मांडणाऱ्या बॉक्सर विजेंदर सिंगने शायरीतून यावर प्रकाश टाकलाय. विजेंदर सिंगच्या या शायरीवर काँग्रेस नेते माजी आमदार मुकेश शर्मा यांनीही समर्थनार्थ दोन ओळी लिहिल्या आहेत. 

ग़रीबी की क्या ख़ूब हँसी उड़ाई जा रही है,1 रोटी देकर 100 तस्वीर खिंचाई जा रही है ।

बॉक्सर विजेंदर सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंटवरु विचार करण्यासारखा विचार मांडला आहे. हजारो युजर्संने विजेंदरचं हे ट्विट रिट्विट करत, हे म्हणणं अतिशय बरोबर असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अनेकांनी हा भाजपा समर्थकांना टोला असल्याचे समजून विजेंदरलाही तूझं तूझं काम करावं, असा सल्ला दिलाय. पण, बहुतांश युजर्संना त्याचं हे ट्विट आवडल्याचं दिसून येतंय. 

तथाकथित नेता व समाज सेवक गरीबों को जलील करना बंद करें! असे  म्हणत मुकेश शर्मा यांनी विजेंदरने अगदी सत्य लिहिल्याचं म्हटलंय. 

‘लॉकडाऊन’चे बºयापैकी पालन होत असतानाच विविध राज्यांमधून हजारो स्थलांतरित कामगारांचे तांडे घराकडे परतत असल्याच्या बातम्यांनी देशभर गहजब झाला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून, या कठोर पावलामुळे जनतेला सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टांबद्दल क्षमायाचना केली होती. काही दिवसांसाठी सर्वांना कळ सोसावीच लागेल, ‘लॉकडाऊन’ पाळला नाही, तर या धोक्यापासून देशाला वाचविणे कठीण होऊन बसेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVijender Singhविजेंदर सिंगSocial Mediaसोशल मीडिया