शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Coronavirus: कोरोनाचे नवे ८३ टक्के रुग्ण महाराष्ट्रासह ६ राज्यांत; रुग्णवाढीने चिंतेचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 07:14 IST

केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेशमध्ये अधिक खबरदारीच्या सूचना

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. सध्या देशात आढळणाऱ्या नव्या रुग्णांमधील ८३.१४ टक्के महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या सहा राज्यांत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. या राज्यांत खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक २७ हजार १३६, पंजाब २ हजार ५७८ आणि केरळमध्ये २ हजार ७८ नवे रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकमध्ये १ हजार ७९८, गुजरातमध्ये १ हजार ५६५ तर मध्य प्रदेशमध्ये १ हजार ३०८ नवे बाधित आढळले आहेत. हा संसर्ग वाढू लागल्याने पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यात शा‌ळा बंद करणे, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणि लॉकडाऊनसारखे निर्बंध पुन्हा लागू करावे लागत आहेत.

रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यामागे नागरिकांकडून कोरोना निर्बंधांचे पालन करण्यात होत असलेली उदासिनता हेच असल्याचे दिसून येत आहे. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, नागरिकांना सध्या कोरोना पूर्णपणे हद्दपार झाला असे वाटत आहे. खरेतर लोकांनी आणखी काळ गरज नसताना प्रवास करणे टाळले पाहिजे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना कोरोना निर्बंध काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना तपासणी चाचण्यांचा प्रमाण वाढवण्यास सांगण्यात आले आहे. कोरोना रोखण्यासाठी बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या