शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

coronavirus: एअर इंडियाची १९ मे ते २ जूनदरम्यान विमानसेवा, अडकून पडलेल्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 6:27 AM

ही विशेष विमानसेवा म्हणजे देशांतर्गत विमानसेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची नांदी आहे असे कोणीही समजू नये असे एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

नवी दिल्ली : देश लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात प्रवेश करण्याच्या तयारीत असताना, एअर इंडियाने १९ मे ते २ जून या कालावधीत मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोची, जयपूर या शहरांतून विशेष विमाने सोडण्याचे ठरविले आहे. कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागांत अडकून पडलेल्यांना त्यांच्या इच्छितस्थळी नेण्यासाठी ही विशेष विमानसेवा असेल.ही विशेष विमानसेवा म्हणजे देशांतर्गत विमानसेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची नांदी आहे असे कोणीही समजू नये असे एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. विविध भागांत अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या शहरी नेऊन पोहोचविण्यासाठी एअर इंडिया विशेष मोहीम हाती घेतली असून त्याचा हा दुसरा टप्पा आहे. देशांतर्गत विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यास केंद्र सरकार तयार आहे. मात्र, त्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून हिरवा कंदिल मिळाला पाहिजे. विशेष विमानसेवेची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल व प्रवाशांना तिकिटांचे आॅनलाइन बुकिंग करता येईल. एअर इंडियाचा एक कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्याने या कंपनीचे कार्यालय सील करण्यात आले आहे. या कंपनीच्या पाच पायलटनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त नुकतेच झळकले होते. पण दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीत या पाच जणांना संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. नेमके त्याच वेळेला एअर इंडियाच्या विशेष विमानसेवेची घोषणा झाली आहे. अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या गावी नेण्यासाठी रेल्वे खात्यानेविशेष रेल्वेगाड्या चालविल्या असून त्यात धर्तीवर एअर इंडियाने निर्णय घेतला आहे.असा आहे विशेष विमानसेवेचा आराखडाएअर इंडियाच्या विशेष विमानसेवेच्या अंतर्गत दिल्लीहून जयपूर, बंगळुरू, हैदराबाद, अमृतसर, कोची, अहमदाबाद, विजयवाडा, गया, लखनौ या शहरासांठी विमाने सोडण्यात येतील. मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद, विजयवाडा येथे तर हैदराबादहून दिल्ली, मुंबईसाठी विमाने रवाना होतील. बंगळुरूहून मुंबई, दिल्ली, हैदराबादला विमाने जातील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAir Indiaएअर इंडिया